शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 7:08 PM

औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील तीन गावे, तर जालना जिल्ह्यातील उर्वरित ६५ गावांचा समावेश असून सध्या ही गावे आपले दैनंदिन व्यवहार अंधारातच पार पाडत आहेत.

यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, एक मार्चपासून थकबाकीदार ग्राहकांच्या विरोधात महावितरणने थकबाकी वसुलीची धडक मोहीम सुरू केली. शहरात ६० हजार ग्राहकांकडे ७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या २० दिवसांच्या कालावधीत अवघी १४ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. शहरामधील थकबाकीदार ग्राहकांनी या मोहिमेला प्रतिसाद न दिल्यामुळे तब्बल २४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणने शून्य थकबाकी मोहीम सुरू केली आहे. औरंगाबाद  आणि जालना जिल्ह्यांमध्ये १ लाख ९७ हजार ५८९ ग्राहकांकडे  जवळपास १४४ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. 

औरंगाबाद शहरात विभाग क्रमांक एक आणि क्रमांक दोनमध्ये ६० हजार ४९८ वीजग्राहकांकडे ७५ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. या मोहिमेत अधिकारी-कर्मचारी सकाळपासून सायंकाळपर्यंत जीवतोडून परिश्रम घेत असून, थकबाकीदार ग्राहकांकडून १४ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश मिळविले आहे. थकबाकीदार ग्राहकांकडून वसुली होत नसल्यामुळे एक हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. १ मार्चपासून २४ हजार ३१४ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात, तर ३७३ ग्राहकांचा कायमचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे २ कोटी १३ लाख रुपये थकबाकी आहे.

ही गावे आहेत अंधारातकन्नड विभागांतर्गत अंबाला, भडली, खर्डी या तीन गावांचा संपूर्ण वीजपुरवठा कापण्यात आला आहे. याशिवाय जालना विभाग क्रमांक एकमध्ये काजळा, नांदापूर, वरखेडा, बेठलम, इंदलकरवाडी, धार, धावेडी, बोरगाव, बीबी, निरखेडा या दहा गावांचा आणि जालना विभाग क्रमांक दोनमध्ये शेरगोडा, अंगलगाव, डोलारा, पांडे पोखरी, सुरमगाव, हातडी, परवाडी, वडारवाडी, वाळखेड, घाणेगाव, लिंबी, नागोबाची वाडी, विरेगाव, कोटला, गुंज, घोसी, बंगालेवाडी, मुधेगावा, चपडगाव, मानेपुरी, बोरगाव तांडा, भायगव्हाण, मंगरूळ, अंभोडा खुर्द, वीरगव्हाण, मुरूमखेडा, तालटोंडी, ठेगेवदगव्हाण, पांगरी वायाळ, वाधेगाव, वाघोडा, वाघला, सहद वडगाव, वरूड, वझर सरकटे, वाधोना, खडकी, जयपूर, भांबेरी, दोडगव्हाण, सौंदलगाव, डोमेगाव, रेणापुरी, नालेवाडी, डोणगाव, आपेगाव, जालोरा, करंजळा, कुरण, डोमलगाव, चर्मापुरी, गोंदी, घुंगर्डे हादगाव या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMONEYपैसाAurangabadऔरंगाबादJalanaजालना