शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

विजेच्या समस्यांनी ग्राहक त्रस्त

By admin | Updated: June 13, 2014 00:34 IST

वाशी : वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही.

वाशी : वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही. त्याचबरोबर ठिकठिकाणी लोंबकाळणाऱ्या तारा आणि नादुरुस्त डीपींकडे दुर्लक्ष होत असून, साहित्याचा तुटवडा असल्याचे कारण देत किरोकळ दुरूस्तीलाही विलंब लावला जात असल्याने विजेबाबतच्या समस्यांना ग्राहक वैतागल्याचे दिसत आहे.तालुक्यात साडेसहाशे विद्युत डीपी असून, यापैकी ४७५ डीपी या शेतीपंपासाठी तर उर्वरित घरगुती, वाणिज्य वापरासाठी आहेत. सर्व डीपीच्या देखभालीसाठी तालुक्यात २२ लाईनमन असून, त्यापैकी चौघे निलंबित आहेत. तर केवळ एकाच लाईनमनवर शहराची मदार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झाल्याचे दिसते. शेतातील अनेक वीज वाहिन्या जमिनीलगत झुकलेल्या असून, काही ठिकाणचे पोल वाकडे झालेले आहेत. डीपींचीही अशीच दुरवस्था आहे. अनेक डीपीत फ्यूज नाहीत, तर काही डीपीतील आॅईलची पातळी खालावल्याचे दिसते. जेव्हा एखादा डीपी जळतो, त्याच वेळी त्याच्याकडे पाहिले जाते. शिवाय, हा डीपी काढणे, त्याची वाहतूक आदी खर्चाचा भुर्दंडही ग्राहकांनाच सहन करावा लागतो, असा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. वीज कंपनी कार्यालयात फ्यूज वायरसह इतर अनेक साहित्याचा तुटवडा असल्याचेही सांगितले जाते. (वार्ताहर)तालुक्यात अनेक ग्राहकांकडे वीज बिल थकले आहे. यासाठी वीज कंपनीच्या उस्मानाबाद येथील विधि अधिकाऱ्याकडून सध्या कायदेशीर नोटिसा पाठवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कदाचित पुढील आठवड्यात या नोटिसा ग्राहकांच्या हातात पडण्याचीही शक्यता आहे. सदर नोटिसीत ‘वीज कंपनीने केलेल्या करारानुसार व महाराष्ट्र राज्य विज नियामक आयोगाने ठरवलेल्या दरानुसार व नियमानुसार आपण वीज बिल देण्याचे मान्य केलेले असून, त्या अटीनुसार आपणास वीज पुरवठा केलेला आहे. मात्र, आपणास वीज बील देऊनही आपण त्याचा भरणा केलेला नाही. त्यामुळे आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच थकित रकमेवर १८ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल व न्यायालयात आपल्याविरूध्द योग्य ती कारवाही करण्यात येईल’, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ऐन खरीप पेरणीच्या तोंडावरच या नोटिसा बजावण्यात येत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेत बिल भरणा हवावाशी शहरासह तालुक्यातील विद्युत ग्राहकांना विद्युत बिलाचा भरणा करण्यासाठी वीज कंपनीच्या कार्यालयात जावे लागत असून, हे कार्यालय शहरापासून दूर आहे. विशेषत: वयोवृध्द व महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदरचा भरणा येथील राष्ट्रीयकृत बँकेत करण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी ग्राहकातून होत आहे. बिलांच्या दुरुस्तीसाठी हेलपाटेतालुक्यात शेतीपंपाचे ९०५३, घरगुती ११९७, वाणिज्य ६७२, औद्यगिक १८६ तर पाणीपुरवठा वापराचे ६९ ग्राहक आहेत. याचा हिशोब ठेवण्यासाठी येथील उपविभागीय कार्यालयात सहाय्यक अभियंता, उपअभियंत्यासह दहा कर्मचारी असून, त्यांच्याकडून चुकीच्या बिलांची दुरूस्ती व इतर कामेही वेळेत होत नसल्याने ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. येथील सहाय्यक अभियंता हे मुख्यालयात राहत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नुकताच याचा अनुभव आला. गेल्याच आठवड्यात त्यांनी येथे भेट दिली असता सहाय्यक अभियंता उपस्थित नसल्याने त्यांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.