शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

विजेच्या समस्यांनी ग्राहक त्रस्त

By admin | Updated: June 13, 2014 00:34 IST

वाशी : वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही.

वाशी : वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही. त्याचबरोबर ठिकठिकाणी लोंबकाळणाऱ्या तारा आणि नादुरुस्त डीपींकडे दुर्लक्ष होत असून, साहित्याचा तुटवडा असल्याचे कारण देत किरोकळ दुरूस्तीलाही विलंब लावला जात असल्याने विजेबाबतच्या समस्यांना ग्राहक वैतागल्याचे दिसत आहे.तालुक्यात साडेसहाशे विद्युत डीपी असून, यापैकी ४७५ डीपी या शेतीपंपासाठी तर उर्वरित घरगुती, वाणिज्य वापरासाठी आहेत. सर्व डीपीच्या देखभालीसाठी तालुक्यात २२ लाईनमन असून, त्यापैकी चौघे निलंबित आहेत. तर केवळ एकाच लाईनमनवर शहराची मदार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झाल्याचे दिसते. शेतातील अनेक वीज वाहिन्या जमिनीलगत झुकलेल्या असून, काही ठिकाणचे पोल वाकडे झालेले आहेत. डीपींचीही अशीच दुरवस्था आहे. अनेक डीपीत फ्यूज नाहीत, तर काही डीपीतील आॅईलची पातळी खालावल्याचे दिसते. जेव्हा एखादा डीपी जळतो, त्याच वेळी त्याच्याकडे पाहिले जाते. शिवाय, हा डीपी काढणे, त्याची वाहतूक आदी खर्चाचा भुर्दंडही ग्राहकांनाच सहन करावा लागतो, असा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. वीज कंपनी कार्यालयात फ्यूज वायरसह इतर अनेक साहित्याचा तुटवडा असल्याचेही सांगितले जाते. (वार्ताहर)तालुक्यात अनेक ग्राहकांकडे वीज बिल थकले आहे. यासाठी वीज कंपनीच्या उस्मानाबाद येथील विधि अधिकाऱ्याकडून सध्या कायदेशीर नोटिसा पाठवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कदाचित पुढील आठवड्यात या नोटिसा ग्राहकांच्या हातात पडण्याचीही शक्यता आहे. सदर नोटिसीत ‘वीज कंपनीने केलेल्या करारानुसार व महाराष्ट्र राज्य विज नियामक आयोगाने ठरवलेल्या दरानुसार व नियमानुसार आपण वीज बिल देण्याचे मान्य केलेले असून, त्या अटीनुसार आपणास वीज पुरवठा केलेला आहे. मात्र, आपणास वीज बील देऊनही आपण त्याचा भरणा केलेला नाही. त्यामुळे आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच थकित रकमेवर १८ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल व न्यायालयात आपल्याविरूध्द योग्य ती कारवाही करण्यात येईल’, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ऐन खरीप पेरणीच्या तोंडावरच या नोटिसा बजावण्यात येत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेत बिल भरणा हवावाशी शहरासह तालुक्यातील विद्युत ग्राहकांना विद्युत बिलाचा भरणा करण्यासाठी वीज कंपनीच्या कार्यालयात जावे लागत असून, हे कार्यालय शहरापासून दूर आहे. विशेषत: वयोवृध्द व महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदरचा भरणा येथील राष्ट्रीयकृत बँकेत करण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी ग्राहकातून होत आहे. बिलांच्या दुरुस्तीसाठी हेलपाटेतालुक्यात शेतीपंपाचे ९०५३, घरगुती ११९७, वाणिज्य ६७२, औद्यगिक १८६ तर पाणीपुरवठा वापराचे ६९ ग्राहक आहेत. याचा हिशोब ठेवण्यासाठी येथील उपविभागीय कार्यालयात सहाय्यक अभियंता, उपअभियंत्यासह दहा कर्मचारी असून, त्यांच्याकडून चुकीच्या बिलांची दुरूस्ती व इतर कामेही वेळेत होत नसल्याने ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. येथील सहाय्यक अभियंता हे मुख्यालयात राहत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नुकताच याचा अनुभव आला. गेल्याच आठवड्यात त्यांनी येथे भेट दिली असता सहाय्यक अभियंता उपस्थित नसल्याने त्यांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.