शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

धुमशान पावसाने औरंगाबाद महापालिकेची पोलखोल; प्रशासनाने केला तत्परतेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 16:35 IST

rain in Aurangabad : जेसीबीच्या साह्याने बुढीलेन रस्त्यावरील गाळ काढला. कबाडीपुरा आरोग्य केंद्रात शिरलेले पावसाचे पाणी काढण्यात आले.

औरंगाबाद : मंगळवारी रात्री औरंगाबाद शहरात ढगफुटी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने ( Aurangabad Municipal Corporation) तत्परता दाखविली नाही. बुधवारी सकाळपासून काही भागांत छोटी-मोठी कामे करण्यात आली. तत्परतेने कामे केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

जेसीबीच्या साह्याने बुढीलेन रस्त्यावरील गाळ काढला. कबाडीपुरा आरोग्य केंद्रात शिरलेले पावसाचे पाणी काढण्यात आले. खाम नदीपात्राच्या परिसरातील गरमपाणी, कोतवालपुरा या वसाहतींतील नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना केली. चुनाभट्टी पुलावर साचलेली माती, कचरा साफ करण्यात आला. धोबीघाट, फाजलपुरा येथील पुलावरील, टिळकपथ येथील कचरा साफ करण्यात आला. बारूदगरनाला येथील गल्लीत साचलेला कचरा, मृत जनावरे जेसीबीने नेण्यात आली. औषधी भवन रोडवरील कचरा उचलून स्वच्छ करण्यात आला. किराडपुरा, औरंगाबाद टाइम्स कॉलनी या ठिकाणी नाल्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी २ जेसीबी तैनात करण्यात आले. स्वामी विवेकानंदनगर एन-१२ येथील जितेंद्र पाटील, शशिकांत पाटील यांच्या घरामध्ये ड्रेनेजचे पाणी शिरले होते. जेटिंग मशीनद्वारे चोकअप काढण्यात आले. सुदर्शननगर येथील दोन घरांच्या तळमजल्यात पाणी शिरले होते. मोटारीने पाणी उपसण्यात आले. हर्सूल भागात फुलेनगर येथे घरांमध्ये शिरलेले पाणी जेसीबीच्या साहाय्याने पाण्याला वाट मोकळी करून दिली. चेतनानगर भागात पोलीस कॉलनीमध्ये पाणी शिरले होते. ग्रीन व्हॅली, गीतानगर भागातील पाणी काढण्यात आले.

शिवनेरी कॉलनीत येथील पार्वती कन्या विद्यालयाशेजारील भिंत पडली होती. मलबा जेसीबीने उचलण्यात आला. आंबेडकरनगर येथील ग्रीव्हज् कंपनी ते जाधववाडी रस्त्यालगतच्या तीन घरांत शिरलेले पाणी काढण्यात आले. मिसरवाडी येथील सिकंदर कॉलनी, रोशननगर, श्रीकृष्णनगर, सुभेदार रामजीनगर येथील पाणी काढले.चौधरी कॉलनी येथील सावता मंगल कार्यालय, आठवडी बाजारासमोरील पुलावर अडकलेल्या फांद्या, मलबा काढला. हिनानगर, गुलमोहर कॉलनी येथील राजीव गांधी मैदान, चिकलठाणा येथील मुल्ला गल्ली, राजनगर, मुकुंदनगर येथे साचलेले पाणी काढले. वीटखेडा येथील स्मशानभूमीची संरक्षक भिंत नाल्यात पडली. सातारा परिसरातील कुलकर्णी यांच्या मोकळ्या जागेवरील संरक्षक भिंत पडली. श्रेयनगर येथील शलाखा अपार्टमेंटजवळील पुलालगत पाइपमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोल, झाडे मलबा साचल्याने नाल्याच्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला होता. सुयोग कॉलनी, पानट हॉस्पिटल, गौतमनगर, रोकडिया हनुमान कॉलनी, स्नेहनगर, संकल्प अपार्टमेंट, विष्णूनगर येथील गटारी साफ करण्यात आल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊस