शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

धुमशान पावसाने औरंगाबाद महापालिकेची पोलखोल; प्रशासनाने केला तत्परतेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 16:35 IST

rain in Aurangabad : जेसीबीच्या साह्याने बुढीलेन रस्त्यावरील गाळ काढला. कबाडीपुरा आरोग्य केंद्रात शिरलेले पावसाचे पाणी काढण्यात आले.

औरंगाबाद : मंगळवारी रात्री औरंगाबाद शहरात ढगफुटी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने ( Aurangabad Municipal Corporation) तत्परता दाखविली नाही. बुधवारी सकाळपासून काही भागांत छोटी-मोठी कामे करण्यात आली. तत्परतेने कामे केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

जेसीबीच्या साह्याने बुढीलेन रस्त्यावरील गाळ काढला. कबाडीपुरा आरोग्य केंद्रात शिरलेले पावसाचे पाणी काढण्यात आले. खाम नदीपात्राच्या परिसरातील गरमपाणी, कोतवालपुरा या वसाहतींतील नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना केली. चुनाभट्टी पुलावर साचलेली माती, कचरा साफ करण्यात आला. धोबीघाट, फाजलपुरा येथील पुलावरील, टिळकपथ येथील कचरा साफ करण्यात आला. बारूदगरनाला येथील गल्लीत साचलेला कचरा, मृत जनावरे जेसीबीने नेण्यात आली. औषधी भवन रोडवरील कचरा उचलून स्वच्छ करण्यात आला. किराडपुरा, औरंगाबाद टाइम्स कॉलनी या ठिकाणी नाल्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी २ जेसीबी तैनात करण्यात आले. स्वामी विवेकानंदनगर एन-१२ येथील जितेंद्र पाटील, शशिकांत पाटील यांच्या घरामध्ये ड्रेनेजचे पाणी शिरले होते. जेटिंग मशीनद्वारे चोकअप काढण्यात आले. सुदर्शननगर येथील दोन घरांच्या तळमजल्यात पाणी शिरले होते. मोटारीने पाणी उपसण्यात आले. हर्सूल भागात फुलेनगर येथे घरांमध्ये शिरलेले पाणी जेसीबीच्या साहाय्याने पाण्याला वाट मोकळी करून दिली. चेतनानगर भागात पोलीस कॉलनीमध्ये पाणी शिरले होते. ग्रीन व्हॅली, गीतानगर भागातील पाणी काढण्यात आले.

शिवनेरी कॉलनीत येथील पार्वती कन्या विद्यालयाशेजारील भिंत पडली होती. मलबा जेसीबीने उचलण्यात आला. आंबेडकरनगर येथील ग्रीव्हज् कंपनी ते जाधववाडी रस्त्यालगतच्या तीन घरांत शिरलेले पाणी काढण्यात आले. मिसरवाडी येथील सिकंदर कॉलनी, रोशननगर, श्रीकृष्णनगर, सुभेदार रामजीनगर येथील पाणी काढले.चौधरी कॉलनी येथील सावता मंगल कार्यालय, आठवडी बाजारासमोरील पुलावर अडकलेल्या फांद्या, मलबा काढला. हिनानगर, गुलमोहर कॉलनी येथील राजीव गांधी मैदान, चिकलठाणा येथील मुल्ला गल्ली, राजनगर, मुकुंदनगर येथे साचलेले पाणी काढले. वीटखेडा येथील स्मशानभूमीची संरक्षक भिंत नाल्यात पडली. सातारा परिसरातील कुलकर्णी यांच्या मोकळ्या जागेवरील संरक्षक भिंत पडली. श्रेयनगर येथील शलाखा अपार्टमेंटजवळील पुलालगत पाइपमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोल, झाडे मलबा साचल्याने नाल्याच्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला होता. सुयोग कॉलनी, पानट हॉस्पिटल, गौतमनगर, रोकडिया हनुमान कॉलनी, स्नेहनगर, संकल्प अपार्टमेंट, विष्णूनगर येथील गटारी साफ करण्यात आल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊस