शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

राजकीय मंडळींनो, हे पाहा आलो, अतिक्रमणेही पाडली ! महापालिका विरुद्ध ‘राज’कारण शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 1:47 PM

Political leaders against the Aurangabad Municipal Corporation राजकीय मंडळींनी महापालिकेस गुलमंडीवर पाऊल ठेऊ नका असा इशारा दिला होता

ठळक मुद्दे कुंभारवाडा ते औरंगपुरा पोलीस चौकीपर्यंत लहान मोठी अतिक्रमणे पाडण्यात आली.सायंकाळपर्यंत ५० पेक्षा अधिक लहान-मोठी अतिक्रमणे काढण्यात आली.

औरंगाबाद : गुलमंडीवर सोमवारी सायंकाळी शिवसेना-भाजपच्या राजकीय मंडळींनी महापालिकेच्या नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्याला ‘गुलमंडीवर येऊच नका’ म्हणत बेदम मारहाण केली. मंगळवारी सकाळीच महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक आणि नगररचना विभागातील कर्मचारी ‘आम्ही आलो’ म्हणत दाखल झाले. त्यांनी व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील सर्व ओटे जमीनदोस्त करून शहरात कायद्याचे राज्य आहे, हे दाखवून दिले.

त्याचे झाले असे की, महापालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून सोमवारी सायंकाळी गुलमंडीवर मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई सुरू होती. त्यात दोन विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. ते पथकासमोर गयावया करीत रडत होते. तेथे उपस्थित माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांचा माणुसकीचा झरा फुटला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्यास ‘गुलमंडीवर येऊ नका’ म्हणून बेदम मारहाण केली. घटनेनंतर सेनेचे माजी आ. किशनचंद तनवाणीही तेथे आले. रात्री उशिरा क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

महापालिका प्रशासनाने सकाळीच गुलमंडीवर अतिक्रमण हटाव पथक, नगररचना विभागाचे अधिकारी, कर्मचारी कारवाईसाठी पाठवून दिले. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्किंगनुसार बाराभाई ताजिया ते कुंभारवाडा कॉर्नरपर्यंत व्यापाऱ्यांचे सर्व ओटे जेसीबीने जमीनदोस्त केले. कुंभारवाडा ते औरंगपुरा पोलीस चौकीपर्यंत लहान मोठी अतिक्रमणे पाडण्यात आली. सायंकाळपर्यंत ५० पेक्षा अधिक लहान-मोठी अतिक्रमणे काढण्यात आली. लोखंडी शेड, पत्रे, ओटे मोठ्या संख्येने काढण्यात आले. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक सहाय्यक जमशीद, मजहर अली, पी. बी. गवळी यांनी केली.

मारामारी अनैतिक, अशोभनीय, अवैधानिकमहाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. माजी सैनिकांच्या विरोधात तक्रार असेल तर ती रीतसर प्रशासनाकडे मांडली पाहिजे. प्रशासन चौकशी करून दोषींवर कारवाई करील. माजी सैनिकांनी नम्रपणे नागरिकांना वागणूक दिली पाहिजे, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. गुलमंडीवर नेमकी काय कारवाई सुरू आहे, याबाबत कल्पना नाही.- आस्तिक कुमार पाण्डेय, प्रशासक मनपा

प्रशासनाने सूडबुद्धीने काम करू नयेगुलमंडीवर मंगळवारी सकाळपासून व्यापाऱ्यांचे ओटे तोडण्यात येत आहेत. सूडबुद्धीने प्रशासन वागत आहे. कारण नसताना ओटे कशासाठी तोडण्यात आले. शहरात सर्वत्र अतिक्रमणे आहेत. सगळीकडेच महापालिकेने कारवाई करावी. एकट्या गुलमंडीची निवड कशासाठी करण्यात आली? आता ओटे तोडले तर रोडचे काम कधी करणार? या भागातील रस्ते रुंद करून घ्यावेत यासाठी अनेक वर्षांपासून मागणी सुरू आहे. त्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.- किशनचंद तनवाणी, माजी आमदार.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद