शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

पोलीस भरतीचे ‘मेरिट’ १८० गुणांपर्यंत?

By admin | Updated: April 17, 2016 01:32 IST

औरंगाबाद : खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून मागील अनेक वर्षांपासून भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लवकरच ‘खाकी’ चे स्वप्न साकार होणार आहे

औरंगाबाद : खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून मागील अनेक वर्षांपासून भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लवकरच ‘खाकी’ चे स्वप्न साकार होणार आहे. जिवाचे रान करून सुरुवातीला मैदानी चाचणीत ‘मेरिट’ मिळविलेल्या आणि नंतर १३ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत चांगले गुण घेतलेल्या अंतिम ५६ जणांची यादी दोन दिवसांत आयुक्तालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, १८० गुणांपर्यंत ‘मेरिट’ गेल्याचा अंदाज उमेदवारांनी व्यक्त केला आहे.शहर पोलीस दलाची प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २९ मार्चपासून सुरू आहे. दरम्यान, त्यापूर्वीच ५६ जागांसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. १० हजार पुरुष आणि २ हजार महिला उमेदवारांनी अर्ज केले होते. प्रत्येक दिवशी २ हजार ३०० उमेदवारांना बोलावून २९ मार्चपासून मैदानी चाचणी सुरू झाली. २ एप्रिल रोजी महिलांची मैदानी चाचणी घेण्यात आली. ४३ टेबल लावून अधिकाऱ्यांमार्फत कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. भरती प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.मैदानी चाचणी झाल्यावर लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी आयुक्तालयात प्रसिद्ध करण्यात आली होती. मैदानी चाचणीत १०० पैकी ९८ गुण मिळविणारा उमेदवार सर्वांत पुढे होता. एका जागेसाठी १५ याप्रमाणे ९५४ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले. पैकी ९१२ जणांनी परीक्षेला हजेरी लावली. दुसऱ्याच दिवशी कोणाला किती गुण मिळाले, याची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यात एका उमेदवाराने १०० पैकी ९२ गुण मिळविले आहेत. अनेक उमेदवार यादी पाहून अंदाज वर्तवीत आहेत.