शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

औरंगाबाद ग्रामीणची बायोमेट्रीक पद्धतीने प्रथमच पोलीस भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 8:17 PM

ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने रिक्त ९६ पदासाठी आज सोमवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात झाली.

औरंगाबाद : ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने रिक्त ९६ पदासाठी आज सोमवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात झाली. पोलीस भरतीत डमी उमेदवार बसविण्यास वाव असू नये, यासाठी या भरतीत बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. संपूर्ण भरती प्रक्रियेवर ईन कॅमेरा होत असून २१ व्हिडिओग्राफर प्रत्येक क्षण टिपत आहे.

पोलीस अधीक्षक डॉॅ. आरती सिंह यांनी या भरती प्रक्रियेविषयी माहिती देताना सांगितले की, औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या अस्थापनेसाठी पोलीस शिपायांची २० तर  कारागृह पोलीस शिपायांच्या ७६ अशा एकूण ९६पदासाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू झाली. आज पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी ४६९ उमेदवारांनी सकाळी साडेपाच वाजता भरतीसाठी हजेरी लावली. उपस्थित उमेदवारांपैकी ३९४ जण मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. 

पोलीस भरती अत्यंत पारदर्शकता ठेवण्यात आल्याचे डॉ.सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले की, उमेदवारांना मैदानी चाचणी देताना त्यांना मिळणाºया गुणांमध्ये अचुकता असावी आणि डमी उमेदवारांना थारा मिळू नये,यासाठी प्रथमच भरतीसाठी येणाºया उमेदवारांची पडताळणी बायोमेट्रीक पद्धतीने करण्यात येत आहे. आर.एफ.आय.डी. पद्धतीद्वारे उमेदवारांचा धावण्याचा अचूक वेळ नोंदवून उमेदवारांना अचूक गुण दिले जाणार आहे. आधुनिक यंत्राचा वापर करून संपूर्ण पोलीस भरती ईन कॅमेरा होत आहे. याकरीता मैदानावर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असून भरती प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण केले जात आहे. या भरतीदरम्यान उमेदवाराला शंका,आक्षेप असल्यास त्याचे लगेच निरसन वरिष्ठ अधिकारी करतील. या भरतीसाठी ४६ पोलीस अधिकारी आणि २०८पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. 

अमिषाला बळी पडू नकाअधीक्षक डॉ.आरती सिंह म्हणाल्या की, आजपासून सुरू झालेली पोलीस भरती अत्यंत पारदर्शक होत आहे. उमेदवारांनी कोणाच्याही अमिषाला बळी पडू नये, तसेच कोणी भरती करून देतो, असे प्रलोभन दाखवून पैशाची मागणी करत असेल किंवा वशिलेबाजीचा प्रयत्न करीत असेल तर त्याबाबतची माहिती तात्काळ आपल्याला द्यावी, अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधवा.   

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी