शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

 डिजिटलायझेशनमुळे पोलीस अधिक उत्तरदायी -मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 1:19 AM

डिजिटलायझेशनमुळे पोलिसांना आता व्यक्तिनिरपेक्ष सेवा द्यावी लागते. मागील तारखेत नोंदी आता करता येत नाहीत. परिणामी पोलीस आता अधिक उत्तरदायी झाले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डिजिटलायझेशनमुळे पोलिसांना आता व्यक्तिनिरपेक्ष सेवा द्यावी लागते. मागील तारखेत नोंदी आता करता येत नाहीत. परिणामी पोलीस आता अधिक उत्तरदायी झाले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.पोलीस आयुक्त कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ.सुभाष झांबड, आ. सतीश चव्हाण, आ. प्रशांत बंब, आ. इम्तियाज जलील, राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) बिपीन बिहारी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त निपुण विनायक, किशनचंद तनवाणी, अंबादास दानवे आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री म्हणाले की, दीड वर्षापूर्वी या इमारतीचे भूमिपूजन आपल्या हस्ते झाले आणि आपणच या इमारतीचे लोकार्पण करीत आहोत. पोलीस आयुक्तालयाची ही इमारत प्रशस्त आणि फंक्शनल अशी आहे. यामुळे येथे बसणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लोकाभिमुख सेवा देता येईल. येथील पोलीस नियंत्रण कक्ष आधुनिक आहे. कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयास लाजवील असे बांधकाम पोलीस गृहनिर्माण मंडळाने केले. मागील ३० वर्षांत जेवढी पोलीस ठाणी, प्रशासकीय इमारती आणि पोलीस निवासस्थानांची कामे झाली, त्यापेक्षा अधिक कामे मागील तीन वर्षांत झाली आहेत. ज्या पोलिसांकडून आपण २४ तास सेवेची अपेक्षा ठेवतो, त्यांना राहण्यासाठी उत्तम घरे आपण दिली आहेत आणि देत आहोत. राज्यातील सर्व ठाणी सीसीटीएनएसशी आणि सेंट्रल सर्व्हरशी जोडली गेली; त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे आणि गुन्ह्यांचे विश्लेषण एका क्लिकवर करणे शक्य झाले.महासंचालक पडसलगीकर म्हणाले की, इमारत बांधकामासाठी प्राप्त झालेल्या एकूण निधीत सव्वाकोटी रुपयांची बचत झाली. उत्तम अशा या इमारतीमुळे येथे काम करणाºया अधिकाºयांना काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. तर महासंचालक बिपीन बिहारी यांनी पोलीस गृहनिर्माण मंडळाच्या कामाचा लेखाजोखा मांडला.प्रास्ताविक पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले. तर सूत्रसंचालन उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी केले.डिजिटल तक्रार नोंदविता येईलडिजिटल तक्रार करण्याची सुविधा आता उपलब्ध केली आहे. पोलिसांच्या वेबसाईटवर, व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलवर तक्रार करता येते. त्यामुळे पोलिसांनी आपली तक्रार घेतली नाही, अथवा तक्रारदार ठाण्यात आलेच नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही. परिणामी पोलिसांसमोर आता व्यक्तिनिरपेक्ष सेवा देण्याचे आव्हान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.इमारतीच्या पायथ्याशी लोकार्पण शिलेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नंतर मुख्यमंत्र्यांनी आणि अन्य मान्यवरांनी पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीची पाहणी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस