शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

वक्फ मालमत्तांची पोलिसांकडून चौकशी

By admin | Updated: January 17, 2016 00:06 IST

औरंगाबाद : शहरात अनेक वक्फ मालमत्तांवर अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी वक्फ अधिकाऱ्यांनाच हाताशी धरून खोटी कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांच्या जागा बळकावण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : शहरात अनेक वक्फ मालमत्तांवर अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी वक्फ अधिकाऱ्यांनाच हाताशी धरून खोटी कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांच्या जागा बळकावण्यात आल्या आहेत. वक्फ मालमत्तांसंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारीनंतर शनिवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले. क्रांतीचौक येथे वक्फ बोर्डाची ७ एकरपेक्षा अधिक जागा आहे. या जागेवर अगोदरच मोठमोठ्या टुमदार इमारती उभ्या आहेत. क्रांतीचौकात मागील आठवड्यात हरप्रीतसिंग निऱ्ह यांनी ज्युबिली पान सेंटर हटवून जागेचा ताबा घेतला होता. या जागेची कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नसताना त्यांनी ताबा घेतला होता. शुक्रवारी आ. इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निऱ्ह यांनी ताबा घेतलेल्या जागेवर जाऊन लोखंडी जाळ्या तोडून टाकल्या. तेथील लोखंडी बोर्डही उखडून फेकला. यावेळी वक्फ अधिकारीही उपस्थित होते. जागेचा ताबा एमआयएमने वक्फ अधिकाऱ्यांना मिळवून दिला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार आ. जलील यांच्यासह दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखलक्रांतीचौक येथील वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून शुक्रवारी एमआयएमचे आ. इम्तियाज जलील व कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला होता. क्रांतीचौकात वक्फ बोर्डाची ७ एकरांहून अधिक जागा आहे. मुख्य रस्त्यावर वक्फ बोर्डाने काही नागरिकांना भाडे करारावर जागा दिली आहे. या जागेवर मागील आठवड्यात हरप्रीतसिंग निऱ्ह यांनी लोखंडी जाळी लावून ताबा मिळविला होता. या घटनेनंतर शुक्रवारी ‘एमआयएम’ने वक्फ बोर्डाला परत जागेचा ताबा मिळवून दिला होता. त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून जागा ताब्यात घेण्यासाठी येथे बळाचा वापर केला. साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी विशेष शाखेचे एस.बी. धुमाळ यांच्या फिर्यादीवरून आ. जलील यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हरप्रीतसिंग निऱ्ह यांच्याविरुद्ध अतिक्रमण करणे आणि जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळविणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.