शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 00:21 IST

लग्नाच्या जेवणातून विषबाधा होऊन सुमारे ५०० ते ६०० नागरिकांना त्रास झाला असून, यामध्ये एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे...

कन्नड (छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील अंबाला गावात ठाकर समाजाच्या आठ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा शुक्रवार, २५ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, लग्नाच्या जेवणातून विषबाधा होऊन सुमारे ५०० ते ६०० नागरिकांना त्रास झाला असून, यामध्ये एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.

सुरेश गुलाब मधे (वय ८, रा. महादेवखोरा, ता. कन्नड) या चिमुकल्याचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. तर, संगीता मेंगाळ (वय २५, रा. अंबाला) या महिलेची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाला गावातील आठ मुलींचा सामूहिक विवाह शुक्रवार दुपारी ४.३० वाजता संपन्न झाला. विवाहानंतर सायंकाळी ५ वाजता जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. अंबाला गावासह कळंकी, महादेवखोरा, तांदुळवाडी, घुसुर, निमडोंगरी, शिपघाट, कोळवाडी, खोलापूर, धामडोह तसेच निरगुडी पिंपरी (ता. खुलताबाद), नांदगाव (जि. नाशिक), चाळीसगाव (जि. जळगाव) येथून आलेल्या ३२ ठाकरवाड्यांतील पाहुण्यांनी जेवण घेतले होते.

आज दुपारपासून दिसली लक्षणे.....शनिवारी, २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून विषबाधेचे लक्षणे दिसू लागली. अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी व तापाची लक्षणे जाणवली. काहींना स्थानिक खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रात्री आठ वाजेच्या सुमारास सर्व रुग्णांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, प्रभारी तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी रुग्णालयाला भेट दिली. कन्नड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड, डॉ. प्रवीण पवार आणि सर्व वैद्यकीय पथक परिस्थिती हाताळण्यासाठी तत्पर झाले आहे.

या घटनेमुळे अंबाला गावात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे. विषबाधेचे नेमके कारण आणि दोषी व्यक्तींची चौकशी सुरू असून, प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाDeathमृत्यूmarriageलग्न