शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 00:21 IST

लग्नाच्या जेवणातून विषबाधा होऊन सुमारे ५०० ते ६०० नागरिकांना त्रास झाला असून, यामध्ये एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे...

कन्नड (छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील अंबाला गावात ठाकर समाजाच्या आठ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा शुक्रवार, २५ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, लग्नाच्या जेवणातून विषबाधा होऊन सुमारे ५०० ते ६०० नागरिकांना त्रास झाला असून, यामध्ये एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.

सुरेश गुलाब मधे (वय ८, रा. महादेवखोरा, ता. कन्नड) या चिमुकल्याचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. तर, संगीता मेंगाळ (वय २५, रा. अंबाला) या महिलेची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाला गावातील आठ मुलींचा सामूहिक विवाह शुक्रवार दुपारी ४.३० वाजता संपन्न झाला. विवाहानंतर सायंकाळी ५ वाजता जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. अंबाला गावासह कळंकी, महादेवखोरा, तांदुळवाडी, घुसुर, निमडोंगरी, शिपघाट, कोळवाडी, खोलापूर, धामडोह तसेच निरगुडी पिंपरी (ता. खुलताबाद), नांदगाव (जि. नाशिक), चाळीसगाव (जि. जळगाव) येथून आलेल्या ३२ ठाकरवाड्यांतील पाहुण्यांनी जेवण घेतले होते.

आज दुपारपासून दिसली लक्षणे.....शनिवारी, २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून विषबाधेचे लक्षणे दिसू लागली. अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी व तापाची लक्षणे जाणवली. काहींना स्थानिक खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रात्री आठ वाजेच्या सुमारास सर्व रुग्णांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, प्रभारी तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी रुग्णालयाला भेट दिली. कन्नड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड, डॉ. प्रवीण पवार आणि सर्व वैद्यकीय पथक परिस्थिती हाताळण्यासाठी तत्पर झाले आहे.

या घटनेमुळे अंबाला गावात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे. विषबाधेचे नेमके कारण आणि दोषी व्यक्तींची चौकशी सुरू असून, प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाDeathमृत्यूmarriageलग्न