शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

औरंगाबादेत नागरिकांचा पाण्याच्या टाकीवर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:43 IST

शहरातील प्रत्येक वॉर्डात पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर ओरड सुरू आहे. शनिवारी सकाळी सिडको एन-६ भागातील मथुरानगरात पाणी न आल्याने संतप्त नागरिकांनी चक्क एन-५ येथील पाण्याच्या टाकीवरच दोन तास हल्लाबोल केला. संतप्त नागरिकांनी टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा थांबवून घेतला. शुक्रवारी गुलमोहर कॉलनी भागातील नागरिकांनी आंदोलन करून स्वत: व्हॉल्व्ह फिरवून पाणी सोडले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔैरंगाबाद : शहरातील प्रत्येक वॉर्डात पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर ओरड सुरू आहे. शनिवारी सकाळी सिडको एन-६ भागातील मथुरानगरात पाणी न आल्याने संतप्त नागरिकांनी चक्क एन-५ येथील पाण्याच्या टाकीवरच दोन तास हल्लाबोल केला. संतप्त नागरिकांनी टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा थांबवून घेतला. शुक्रवारी गुलमोहर कॉलनी भागातील नागरिकांनी आंदोलन करून स्वत: व्हॉल्व्ह फिरवून पाणी सोडले होते.शहरासह सिडको-हडकोत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या लहरीपणाला नागरिक आता जाम कंटाळले आहेत. उन्हाळा सुरू झाल्यापासून पाण्याची ओरड सुरू आहे. वारंवार सूचना देऊनही मनपाचा पाणीपुरवठा विभाग ठोस उपाययोजना करायला तयार नाही. उलट शहरात कृत्रिम पाणीटंचाई जास्तीत जास्त कशी होईल, यावर अधिकारी सर्वात जास्त लक्ष देत आहेत.मनपाच्या या भोंगळ कारभाराला वैतागलेल्या नागरिकांचा संयम हळूहळू सुटत आहे. याचा प्रत्यय शनिवारी सकाळी आला. एन- ६ मथुरानगरला शनिवारी सकाळी सहा वाजता पाणी देण्याची वेळ होती. आठ वाजले तरीही पाणी न आल्याने संतप्त नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. येथे एकानंतर एक टँकर भरण्यात येत होते. त्यामुळे पाण्याच्या टाकीचे गेट लावून नागरिकांनी टँकरचा पाणीपुरवठा बंद केला. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. अधिकाऱ्यांनी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी माघार घेतली. दोन दिवसाआडच पाणी देण्यात यावे, पाणी वेळेवरच द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या . आंदोलनात निर्मला घाटगे, इंदूबाई बोराडे, इंदूबाई शिसोदे, मंगल चौधरी, रामकला पळसकर, कविता शिंदे, अंजली शिंदे, प्रियांका मात्रे, संध्या खरे या महिलांसह मधुकर वाघमारे, चेतन सिंगट, डी. के. बनकर, राम कोंडके, चंद्रसिंग पाटील सहभागी झाले होते.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabadऔरंगाबादWaterपाणीagitationआंदोलन