शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

वंशावळ शंभरीच्या उंबरठ्यावर !

By admin | Updated: August 18, 2015 00:06 IST

संजय तिपाले , बीड चारा- पाण्याची सोय होत नाही म्हणून हतबल झालेले शेतकरी गुरांचा बेभाव बाजार करतअसताना दुसरीकडे मात्र, माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील

संजय तिपाले , बीडचारा- पाण्याची सोय होत नाही म्हणून हतबल झालेले शेतकरी गुरांचा बेभाव बाजार करतअसताना दुसरीकडे मात्र, माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील एका शेतकरी कुटुंबाने गुरांच्या रक्षणाचे व्रत स्वीकारले आहे. एका गाईपासून सुरु झालेली गोसेवेची परंपरा आज तिसरी पिढीही तितक्याच निष्ठेने पुढे नेत आहे. दुष्काळी परिस्थितीतही ते स्वत:कडील नव्वदपेक्षा अधिक व इतरांनी आणून सोडलेल्या वीस ते पंचवीस जनावरांचा सांभाळ करत आहेत.कडाजीराव कोंडीबा जाधव यांचे पवारवाडी शिवारातील देवकृपानगरात शेत आहे. त्यांचे वडील दिवंगत कोंडीबाराव जाधव यांनी ४० वर्षांपूर्वी गुंजथडी (ता. माजलगाव) येथील शेतकऱ्याकडून तांबड्या रंगाची गाय ४०० रुपयांत विकत आणली होती. अंगापिंढाने मजबूत असलेल्या या गाईचे पहिले वेत जाधव यांच्याचकडे झाले. या गाईला ते खूप जीव लावत. वासरांचाही कोंडीबाराव यांना पोटच्या लेकरागत लळा. त्यांनी ठरवले या गाईचे जित्राब अन् दूध कधीच विकायचे नाही. वासरू होवो अथवा कालवड दोन्हींचा ते आंनदाने सांभाळ करत. त्यामुळे गायीची वंशावळ वाढत गेली अन् गोठ्याला नंदनवनाचे स्वरुप येत गेले. २२ वर्षांपूर्वी गाय दगावली तेंव्हा घरातील माणूस गेल्याचे दु:ख जाधव कुटुंबियांना झाले होते. २००९ मध्ये कोंडीबाराव जाधव यांचे निधन झाले. कडाजीराव जाधव यांनी या गायीच्या वासराला पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावला. वडिलांनी गाईला आईप्रमाणे लावलेले प्रेम कडाजीराव यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे त्यांनी गोसेवेत कशाचीही कमी पडू दिली नाही. आता अप्पासाहेब, विठ्ठलराव तसेच मुंजाबा ही त्यांची तीन मुलेही त्यांना याकामी मदत करतात. गोसेवेला व्यापक स्वरुप देण्यासाठी जाधव यांनी गोठ्यात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दोन पूर्णवेळ मजूरही दिमतीला आहेत.एका गुराला महिन्याकाठी सर्वसाधारणे ८ क्विंटल ४० किलो चारा लागतो. जाधव यांच्या गोठ्यात १०० पेक्षा जास्त गुरे आहेत. त्यासाठी २५ लाख मेट्रीक टन चाऱ्याची महिन्याकाठी गरज भासते. आपल्या सात एकर शेतात त्यांनी घास, मका, ज्वारी, बाजरी पेरून चाऱ्याची तरतूद केली आहे. दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी दोन विहिरीतील पाणी चारा जगविण्यासाठी ठिबकद्वारे सोडले. जनावरांचे मूत्र पाईपद्वारे लगतच्या हौदात सोडले आहे. त्याला जोडूनच शेण साठविले जाते. शेण व मूत्र एकत्रित करून त्यापासून सेंद्रीय खत तयार करतात. हेच खत नंतर शेतात वापरले जाते.गोसेवा हीच ईश्वर सेवा आहे. माझ्या वडिलांनी आणलेल्या गायीची वंशावळ ९० च्या पुढे गेल्याचे पाहून आनंद होतो. मुलेही मोठ्या परिश्रमाने गुरांचा सांभाळ करतात. परिसरातील शेतकरी आपली गुरे आणून सोडत आहेत. दुष्काळी स्थितीत या गुरांचाही सांभाळ करायचा आहे. - कडाजीराव जाधव, शेतकरी