शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

समांतर जलवाहिनीसाठी कंपनी तीच; मात्र करार नवीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 19:47 IST

शहरात पाणीपुरवठा योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. समांतर कंपनीसोबत न्यायालयाच्या बाहेर तडजोड करता येऊ शकते का? या दृष्टीने दोन दिवसांपूर्वीच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

औरंगाबाद : शहरात पाणीपुरवठा योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. समांतर कंपनीसोबत न्यायालयाच्या बाहेर तडजोड करता येऊ शकते का? या दृष्टीने दोन दिवसांपूर्वीच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. शासन कंपनीसोबत न्यायालयाच्या बाहेर तडजोड करता येऊ शकते का यावर आपले मत व्यक्त करणार आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती आज प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. उद्या शहरात कंपनी तीच असली तरी नवीन करारानुसारच कंपनीला काम करावे लागणार आहे. जनतेच्या हिताचा हा करार राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रभारी आयुक्त राम पुढे म्हणाले की, समांतर योजनेचे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाबाहेर कंपनीसोबत तडजोड शक्य आहे का? याबाबत शासन महापालिकेला मार्गदर्शन करणार आहे. जर तडजोड करणे शक्य असेल तरच पुन्हा काम सुरू होऊ शकते. नागरिकांच्या हिताचा करार कंपनीसोबत करण्यात येईल. जिथे कंपनीने काम सोडले होते, तेथूनच पुढे काम करावे लागेल. कंपनीला कोणतीही वाढीव रक्कम मिळणार नाही. उद्या कंपनीने १२०० कोटी रुपये मागितले तर मनपा अजिबात देणार नाही. करारात ठरलेली रक्कमच देण्यात येईल. सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊनच पुढील पाऊल उचलण्यात येणार आहे. 

पाणीपट्टीत वाढ अजिबात नाहीफेब्रुवारी २०१८ मध्ये सर्वसाधारण सभेने ठराव ठेवून १ एप्रिल २०१८ पासून पाणीपट्टी, टँकर दरात वाढ करू नये असा ठराव घेतला. हा ठराव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवून देण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीस आधिन राहून संभाव्य दरवाढ रद्द करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून दरवाढ लागू होणार नाही, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रभारी आयुक्तांसमोर सांगितले.

प्रामाणिकपणे काम करणारनवल किशोर राम यांनी सांगितले की, मी येथे आयुक्त म्हणून आलो आहे. किती दिवस आयुक्त राहणार हे माहीत नाही. जेवढे दिवस आहे, तेवढे दिवस प्रामाणिकपणे काम करणार आहे. माझ्याकडे वेळेचे बंधन नाही. कचरा प्रश्न युद्धपातळीवर सोडवीत आहे. याशिवाय आता ५० पेक्षा अधिक फायलींवर सह्या केल्या आहेत. माझ्या क्षमतेवर कोणी विनाकारण प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. 

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणNavalkishor Ramनवलकिशोर रामAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद