शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

समांतर जलवाहिनीसाठी कंपनी तीच; मात्र करार नवीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 19:47 IST

शहरात पाणीपुरवठा योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. समांतर कंपनीसोबत न्यायालयाच्या बाहेर तडजोड करता येऊ शकते का? या दृष्टीने दोन दिवसांपूर्वीच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

औरंगाबाद : शहरात पाणीपुरवठा योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. समांतर कंपनीसोबत न्यायालयाच्या बाहेर तडजोड करता येऊ शकते का? या दृष्टीने दोन दिवसांपूर्वीच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. शासन कंपनीसोबत न्यायालयाच्या बाहेर तडजोड करता येऊ शकते का यावर आपले मत व्यक्त करणार आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती आज प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. उद्या शहरात कंपनी तीच असली तरी नवीन करारानुसारच कंपनीला काम करावे लागणार आहे. जनतेच्या हिताचा हा करार राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रभारी आयुक्त राम पुढे म्हणाले की, समांतर योजनेचे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाबाहेर कंपनीसोबत तडजोड शक्य आहे का? याबाबत शासन महापालिकेला मार्गदर्शन करणार आहे. जर तडजोड करणे शक्य असेल तरच पुन्हा काम सुरू होऊ शकते. नागरिकांच्या हिताचा करार कंपनीसोबत करण्यात येईल. जिथे कंपनीने काम सोडले होते, तेथूनच पुढे काम करावे लागेल. कंपनीला कोणतीही वाढीव रक्कम मिळणार नाही. उद्या कंपनीने १२०० कोटी रुपये मागितले तर मनपा अजिबात देणार नाही. करारात ठरलेली रक्कमच देण्यात येईल. सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊनच पुढील पाऊल उचलण्यात येणार आहे. 

पाणीपट्टीत वाढ अजिबात नाहीफेब्रुवारी २०१८ मध्ये सर्वसाधारण सभेने ठराव ठेवून १ एप्रिल २०१८ पासून पाणीपट्टी, टँकर दरात वाढ करू नये असा ठराव घेतला. हा ठराव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवून देण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीस आधिन राहून संभाव्य दरवाढ रद्द करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून दरवाढ लागू होणार नाही, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रभारी आयुक्तांसमोर सांगितले.

प्रामाणिकपणे काम करणारनवल किशोर राम यांनी सांगितले की, मी येथे आयुक्त म्हणून आलो आहे. किती दिवस आयुक्त राहणार हे माहीत नाही. जेवढे दिवस आहे, तेवढे दिवस प्रामाणिकपणे काम करणार आहे. माझ्याकडे वेळेचे बंधन नाही. कचरा प्रश्न युद्धपातळीवर सोडवीत आहे. याशिवाय आता ५० पेक्षा अधिक फायलींवर सह्या केल्या आहेत. माझ्या क्षमतेवर कोणी विनाकारण प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. 

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणNavalkishor Ramनवलकिशोर रामAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद