शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

समांतर जलवाहिनीसाठी कंपनी तीच; मात्र करार नवीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 19:47 IST

शहरात पाणीपुरवठा योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. समांतर कंपनीसोबत न्यायालयाच्या बाहेर तडजोड करता येऊ शकते का? या दृष्टीने दोन दिवसांपूर्वीच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

औरंगाबाद : शहरात पाणीपुरवठा योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. समांतर कंपनीसोबत न्यायालयाच्या बाहेर तडजोड करता येऊ शकते का? या दृष्टीने दोन दिवसांपूर्वीच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. शासन कंपनीसोबत न्यायालयाच्या बाहेर तडजोड करता येऊ शकते का यावर आपले मत व्यक्त करणार आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती आज प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. उद्या शहरात कंपनी तीच असली तरी नवीन करारानुसारच कंपनीला काम करावे लागणार आहे. जनतेच्या हिताचा हा करार राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रभारी आयुक्त राम पुढे म्हणाले की, समांतर योजनेचे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाबाहेर कंपनीसोबत तडजोड शक्य आहे का? याबाबत शासन महापालिकेला मार्गदर्शन करणार आहे. जर तडजोड करणे शक्य असेल तरच पुन्हा काम सुरू होऊ शकते. नागरिकांच्या हिताचा करार कंपनीसोबत करण्यात येईल. जिथे कंपनीने काम सोडले होते, तेथूनच पुढे काम करावे लागेल. कंपनीला कोणतीही वाढीव रक्कम मिळणार नाही. उद्या कंपनीने १२०० कोटी रुपये मागितले तर मनपा अजिबात देणार नाही. करारात ठरलेली रक्कमच देण्यात येईल. सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊनच पुढील पाऊल उचलण्यात येणार आहे. 

पाणीपट्टीत वाढ अजिबात नाहीफेब्रुवारी २०१८ मध्ये सर्वसाधारण सभेने ठराव ठेवून १ एप्रिल २०१८ पासून पाणीपट्टी, टँकर दरात वाढ करू नये असा ठराव घेतला. हा ठराव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवून देण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीस आधिन राहून संभाव्य दरवाढ रद्द करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून दरवाढ लागू होणार नाही, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रभारी आयुक्तांसमोर सांगितले.

प्रामाणिकपणे काम करणारनवल किशोर राम यांनी सांगितले की, मी येथे आयुक्त म्हणून आलो आहे. किती दिवस आयुक्त राहणार हे माहीत नाही. जेवढे दिवस आहे, तेवढे दिवस प्रामाणिकपणे काम करणार आहे. माझ्याकडे वेळेचे बंधन नाही. कचरा प्रश्न युद्धपातळीवर सोडवीत आहे. याशिवाय आता ५० पेक्षा अधिक फायलींवर सह्या केल्या आहेत. माझ्या क्षमतेवर कोणी विनाकारण प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. 

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणNavalkishor Ramनवलकिशोर रामAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद