शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी लाखांत, तक्रारी केवळ १६,२८७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 14:44 IST

औरंगाबाद ३,८३३, जालना ७,४५३, बीड ४,४८८ आॅनलाईन पूर्वसूचना प्राप्त तक्रारींचा आणि जालन्यातून ५६३ आॅफलाईन तक्रारी पीक विमा जिल्हा समितीकडे आल्या.

ठळक मुद्देआतापर्यंत ४९२४ तक्रारींचा सर्व्हे करण्यात आला२८५३ तक्रारी विमा कंपन्यांकडून मंजूर

- योगेश पायघन 

औरंगाबाद : अतिवृष्टीसह इतर कारणांनी बाधित शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून लाखांत व्यक्त होत असताना केवळ १६ हजार २८७ तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या. त्यात औरंगाबाद ३,८३३, जालना ७,४५३, बीड ४,४८८ आॅनलाईन पूर्वसूचना प्राप्त तक्रारींचा आणि जालन्यातून ५६३ आॅफलाईन तक्रारी पीक विमा जिल्हा समितीकडे आल्या. आतापर्यंत ४९२४ तक्रारींचा सर्व्हे करण्यात आला असून, २८५३ तक्रारी विमा कंपन्यांनी मंजूर केल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

सप्टेंबरपर्यंतच्या नुकसानीचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल, तर आॅक्टोबरचा प्राथमिक नुकसान अहवालानुसार सर्वेक्षण सुरू असल्याचे कृषी विभागाचे सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांनी सांगितले. नुकसानीच्या तीन दिवसांच्या आत तक्रार कृषी विभागाला मिळणे अपेक्षित असते.  आॅनालाईन १५ हजार ७२४ तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. तर आॅफलाईन केवळ जालना जिल्ह्यातून ५६३ तक्रारी करण्यात आल्या. जालना जिल्ह्यातून आलेल्या एकूण ८०१६ तक्रारींपैकी ३३८१ तक्रारी उशिरा, १२६६ पीक उभे नसताना, तर बीडमधील २४९ तक्रारी पीक उभे नसताना, ३४५ तक्रारी इतर कारणांनी फेटाळण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील १९ तक्रारी नाकारल्या गेल्या. १९ आॅक्टोबरपर्यंत आलेल्या तक्रारींतून औरंगाबाद जिल्ह्यात ८४५, जालना जिल्ह्यात १४६४ तर बीड जिल्ह्यात ३७९७ अशा ६१०६ तक्रारींचे सर्वेक्षण बाकी आहे.

शेतकऱ्यांकडून तक्रारींना अनुत्सुकताया तीन जिल्ह्यांत ८ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र सप्टेंबरअखेर प्राथमिक अंदाजानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात १० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पोहचली असताना  आलेल्या तक्रारी फक्त १६ हजार २८७ आहेत. शेतकऱ्यांकडून तक्रारींना अनुत्सुकता असताना पीक काढणीनंतरही नुकसान झाल्याची नोंद करण्यासाठी राजकीय दबाब आणला जात असल्याने फिल्ड वर्क अवघड झाल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादRainपाऊसagricultureशेती