शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी लाखांत, तक्रारी केवळ १६,२८७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 14:44 IST

औरंगाबाद ३,८३३, जालना ७,४५३, बीड ४,४८८ आॅनलाईन पूर्वसूचना प्राप्त तक्रारींचा आणि जालन्यातून ५६३ आॅफलाईन तक्रारी पीक विमा जिल्हा समितीकडे आल्या.

ठळक मुद्देआतापर्यंत ४९२४ तक्रारींचा सर्व्हे करण्यात आला२८५३ तक्रारी विमा कंपन्यांकडून मंजूर

- योगेश पायघन 

औरंगाबाद : अतिवृष्टीसह इतर कारणांनी बाधित शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून लाखांत व्यक्त होत असताना केवळ १६ हजार २८७ तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या. त्यात औरंगाबाद ३,८३३, जालना ७,४५३, बीड ४,४८८ आॅनलाईन पूर्वसूचना प्राप्त तक्रारींचा आणि जालन्यातून ५६३ आॅफलाईन तक्रारी पीक विमा जिल्हा समितीकडे आल्या. आतापर्यंत ४९२४ तक्रारींचा सर्व्हे करण्यात आला असून, २८५३ तक्रारी विमा कंपन्यांनी मंजूर केल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

सप्टेंबरपर्यंतच्या नुकसानीचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल, तर आॅक्टोबरचा प्राथमिक नुकसान अहवालानुसार सर्वेक्षण सुरू असल्याचे कृषी विभागाचे सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांनी सांगितले. नुकसानीच्या तीन दिवसांच्या आत तक्रार कृषी विभागाला मिळणे अपेक्षित असते.  आॅनालाईन १५ हजार ७२४ तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. तर आॅफलाईन केवळ जालना जिल्ह्यातून ५६३ तक्रारी करण्यात आल्या. जालना जिल्ह्यातून आलेल्या एकूण ८०१६ तक्रारींपैकी ३३८१ तक्रारी उशिरा, १२६६ पीक उभे नसताना, तर बीडमधील २४९ तक्रारी पीक उभे नसताना, ३४५ तक्रारी इतर कारणांनी फेटाळण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील १९ तक्रारी नाकारल्या गेल्या. १९ आॅक्टोबरपर्यंत आलेल्या तक्रारींतून औरंगाबाद जिल्ह्यात ८४५, जालना जिल्ह्यात १४६४ तर बीड जिल्ह्यात ३७९७ अशा ६१०६ तक्रारींचे सर्वेक्षण बाकी आहे.

शेतकऱ्यांकडून तक्रारींना अनुत्सुकताया तीन जिल्ह्यांत ८ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र सप्टेंबरअखेर प्राथमिक अंदाजानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात १० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पोहचली असताना  आलेल्या तक्रारी फक्त १६ हजार २८७ आहेत. शेतकऱ्यांकडून तक्रारींना अनुत्सुकता असताना पीक काढणीनंतरही नुकसान झाल्याची नोंद करण्यासाठी राजकीय दबाब आणला जात असल्याने फिल्ड वर्क अवघड झाल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादRainपाऊसagricultureशेती