शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी लाखांत, तक्रारी केवळ १६,२८७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 14:44 IST

औरंगाबाद ३,८३३, जालना ७,४५३, बीड ४,४८८ आॅनलाईन पूर्वसूचना प्राप्त तक्रारींचा आणि जालन्यातून ५६३ आॅफलाईन तक्रारी पीक विमा जिल्हा समितीकडे आल्या.

ठळक मुद्देआतापर्यंत ४९२४ तक्रारींचा सर्व्हे करण्यात आला२८५३ तक्रारी विमा कंपन्यांकडून मंजूर

- योगेश पायघन 

औरंगाबाद : अतिवृष्टीसह इतर कारणांनी बाधित शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून लाखांत व्यक्त होत असताना केवळ १६ हजार २८७ तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या. त्यात औरंगाबाद ३,८३३, जालना ७,४५३, बीड ४,४८८ आॅनलाईन पूर्वसूचना प्राप्त तक्रारींचा आणि जालन्यातून ५६३ आॅफलाईन तक्रारी पीक विमा जिल्हा समितीकडे आल्या. आतापर्यंत ४९२४ तक्रारींचा सर्व्हे करण्यात आला असून, २८५३ तक्रारी विमा कंपन्यांनी मंजूर केल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

सप्टेंबरपर्यंतच्या नुकसानीचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल, तर आॅक्टोबरचा प्राथमिक नुकसान अहवालानुसार सर्वेक्षण सुरू असल्याचे कृषी विभागाचे सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांनी सांगितले. नुकसानीच्या तीन दिवसांच्या आत तक्रार कृषी विभागाला मिळणे अपेक्षित असते.  आॅनालाईन १५ हजार ७२४ तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. तर आॅफलाईन केवळ जालना जिल्ह्यातून ५६३ तक्रारी करण्यात आल्या. जालना जिल्ह्यातून आलेल्या एकूण ८०१६ तक्रारींपैकी ३३८१ तक्रारी उशिरा, १२६६ पीक उभे नसताना, तर बीडमधील २४९ तक्रारी पीक उभे नसताना, ३४५ तक्रारी इतर कारणांनी फेटाळण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील १९ तक्रारी नाकारल्या गेल्या. १९ आॅक्टोबरपर्यंत आलेल्या तक्रारींतून औरंगाबाद जिल्ह्यात ८४५, जालना जिल्ह्यात १४६४ तर बीड जिल्ह्यात ३७९७ अशा ६१०६ तक्रारींचे सर्वेक्षण बाकी आहे.

शेतकऱ्यांकडून तक्रारींना अनुत्सुकताया तीन जिल्ह्यांत ८ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र सप्टेंबरअखेर प्राथमिक अंदाजानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात १० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पोहचली असताना  आलेल्या तक्रारी फक्त १६ हजार २८७ आहेत. शेतकऱ्यांकडून तक्रारींना अनुत्सुकता असताना पीक काढणीनंतरही नुकसान झाल्याची नोंद करण्यासाठी राजकीय दबाब आणला जात असल्याने फिल्ड वर्क अवघड झाल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादRainपाऊसagricultureशेती