शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पश्चिम महाराष्ट्राच्या ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के, तर मराठवाड्याला केवळ ८ टक्के पाणी

By बापू सोळुंके | Updated: March 24, 2023 14:09 IST

‘आमचा हक्क,आमचं पाणी’: मराठवाड्याच्या वहितीलायक २७ टक्के क्षेत्रासाठी केवळ ८ टक्के पाणी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचा एक प्रांत असलेल्या मराठवाड्याचा इतर प्रांतांसारखाच विकास करणे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी निधी वाटपात कायम अन्याय केल्याने मराठवाड्यातील प्रस्तावित अनेक धरणे निधीअभावी २० ते २२ वर्षांपासून अपूर्णच आहेत. परिणामी मागील २० वर्षांत म्हणावी तशी सिंचनक्षमता वाढलेली नाही. मराठवाड्यातील वहितीलायक २७ टक्के क्षेत्रासाठी केवळ ८ टक्के पाणी उपलब्ध आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील वहितीलायक ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के पाणी, तर विदर्भातील २७ टक्के क्षेत्रासाठी १८ टक्के पाणी उपलब्ध आहे.

मराठवाड्यातील ७० टक्के भाग कमी पर्जन्यमानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. यामुळे मराठवाड्यातील एकूण क्षेत्रफळाच्या २७ टक्के क्षेत्रच वहितीलायक आहे. लहरी निसर्गावर अवलंबून असलेल्या या वहितीलायक क्षेत्राला बाराही महिने सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर मराठवाडा सुजलाम-सुफलाम होऊन विकास होईल. राज्यकर्त्यांना माहिती असूनही मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी भरीव निधी दिला गेला नाही. यामुळे अनेक सिंचन प्रकल्प २० वर्षांपासून अर्धवट आहेत. ते तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील सिंचनक्षम क्षेत्राचा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाशी तुलना केली तर मराठवाड्यातील पाण्याची भयावह स्थिती नजरेस पडते. मराठवाडा आणि विदर्भात २७ टक्के क्षेत्र वहितीलायक आहे. या दोन्ही प्रांतांमध्ये अनुक्रमे ८ टक्के आणि १८ टक्के पाणी उपलब्ध आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ४६ टक्के वहितीलायक क्षेत्रासाठी तब्बल ७६ टक्के पाणी उपलब्ध आहे. यावरून मराठवाड्यापेक्षा विदर्भात १० टक्के आणि पश्चिम महाराष्ट्राकडे ३८ टक्के पाणी अधिक आहे. या पाण्याचा प्रतिहेक्टर पाण्याचा विचार केला तर मराठवाडा खूप मागे असल्याचे दिसून येते. पश्चिम महाराष्ट्राकडे प्रतिहेक्टर ८ हजार ८०७ घनमीटर पाणी आहे. तर विदर्भाकडे प्रतिहेक्टर ३६१६ घनमीटर पाणी असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. मराठवाड्याला केवळ १७२९ घनमीटर प्रतिहेक्टर पाणी उपलब्ध आहे.

आंतरराष्ट्रीय मानकानुसार मराठवाडा अतिदुष्काळी क्षेत्रातआंतरराष्ट्रीय मानकानुसार प्रतिमाणशी १ हजार ते १७ हजार घनमीटर पाणी मिळणे आवश्यक आहे. तर ५०० घनमीटर प्रतिमाणशी यापेक्षा कमी पाणी उपलब्ध झाल्यास तो भाग अतिदुष्काळी म्हणून ओळखला जातो. उर्वरित महाराष्ट्रात प्रतिमाणशी १ हजार ३४६ घनमीटर, तर विदर्भाला ९८५ घनमीटर प्रतिमाणशी पाणी उपलब्ध आहे. मराठवाड्यात प्रतिमाणशी सर्वांत कमी ४३८ घनमीटर पाणी मिळते.

महाराष्ट्राची दुष्काळजन्य स्थितीपश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र-- ५० टक्के क्षेत्रविदर्भ--------५० टक्केमराठवाडा------ ७० टक्के

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद