शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

जीएसटीतून इन्स्पेक्टर राजला विरोध; उद्याच्या भारत बंदमध्ये औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 1:15 PM

agitaion against GST व्यापारी कमर्शियल टॅक्स, नळपट्टी, घरपट्टी भरतातच, एखाद्यात २ ते ३ टक्के वाढ घ्या, परवाना शुल्क नको

ठळक मुद्देरेकाॅर्डब्रेक जीएसटी, मग व्यापारी चाेर कसे?कर भरताना नकळत चुका होतात.

औरंगाबाद : शहर चांगले होण्यासाठी टॅक्स घेणे गरजेचे असल्याचे पालकमंत्र्यांनी म्हटले. टॅक्स घेतला पाहिजे, पण किती प्रकारचे टॅक्स घेणार. कमर्शियल टॅक्स, नळपट्टी, घरपट्टी असे विविध टॅक्स महापालिकेला भरत आहोतच. मग आता परवाना शुल्क कशाला हवा. एखाद्या करात २ ते ३ टक्के वाढ करून घ्या एकदाचा, पण अधिक प्रकारचे कर नको. त्यामुळे आमचा परवाना शुल्काला तीव्र विरोध आहे, असे औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे म्हणाले.

केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून इन्स्पेक्टर राज आणण्याचा प्रयत्न करीत आहे. याविरुद्ध २६ फेब्रुवारी रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. याविषयी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना जगन्नाथ काळे बोलत हाेते. यावेळी मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, तनसूख झांबड, विजय जयस्वाल, जयंत देवळाणकर, गुलाम हक्कानी, अनिल चुत्तर आदी उपस्थित होते. औरंगाबाद महापालिकेने व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक केले आहे. आम्ही ज्या जागेत व्यवसाय करतो, त्याचा महापालिकेला व्यावसायिक दराने मालमत्ता कर भरतो. परत त्याच व्यवसायासाठी परवाना शुल्क आकारणे गैरकायदेशीर आहे. याचा निषेध म्हणून औरंगाबादेतील व्यापारी बंद पुकारत आहेत. जीएसटी कायद्यातील जाचक अटी आणि तरतुदीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या भारत बंदला औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा असल्याची माहिती जगन्नाथ काळे यांनी दिली.

रेकाॅर्डब्रेक जीएसटी, मग व्यापारी चाेर कसे?व्यापारी मोठ्या प्रमाणात जीएसटी भरतात. कोरोना महामारीनंतर १ लाख १५ हजार कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला. व्यापारी रेकाॅर्ड ब्रेक जीएसटी भरतात, मग ते चोर कसे? कर भरताना नकळत चुका होतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना त्यासंदर्भात म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली पाहिजे. कुठलीही सुनावणी न करता,नाेटीस न देताना माल जप्त करणे, जीएसटी नोंदणी रद्द करणे आदींत बदल केले पाहिजे, असेही जगन्नाथ काळे म्हणाले. 

टॅग्स :GSTजीएसटीAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन