शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

शिष्यवृत्तीसाठी उद्यापर्यंत ‘रिव्हर्ट बॅक’ची संधी; ‘राईट टू गिव्ह अप’मुळे हजारो विद्यार्थी वंचित

By विजय सरवदे | Updated: June 29, 2024 16:40 IST

अनेक विद्यार्थ्यांनी चुकून या बटनावर क्लिक केल्यामुळे त्यांच्यावर शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे

छत्रपती संभाजीनगर : महाडीबीडी पोर्टलवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरताना अनावधानाने ‘राईट टू गिव्ह अप’ या बटनवर क्लिक केलेले जिल्ह्यातील जवळपास एक हजार, तर राज्यातील हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले होते. दरम्यान, या संदर्भात विद्यार्थी संघटनांनी केलेल्या आंदोलनाच्या रेट्यामुळे समाज कल्याण विभागाने आता ‘रिव्हर्ट बॅक’ची संधी दिली आहे. यासाठी ३० जूनपर्यंत महाडीबीटी पोर्टल सुरू ठेवण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जाती, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीअंतर्गत शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, निर्वाह भत्ता दिला जातो. मात्र, यंदा पहिल्यांदाच महाडीबीटी पोर्टलवर गॅस अनुदान सोडण्यासाठी दिलेल्या पर्यायाच्या धर्तीवर स्वेच्छेने शिष्यवृत्ती सोडण्यासाठी राज्य शासनाने ‘राइट टू गिव्हअप’चे बटन दिले होते. अनेक विद्यार्थ्यांनी चुकून या बटनावर क्लिक केल्यामुळे त्यांच्यावर शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. 

हे बटन क्लिक केल्यामुळे जिल्ह्यातील अनुसूचित जातीचे सुमारे ४ हजार ५००, तर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द झाले होते. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी राज्यभरात विद्यार्थी आणि लोकप्रतिधिनींनी जोर लावल्यामुळे समाज कल्याण विभागाने अखेर ‘रिव्हर्ट बॅक’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थ्यांनी ३० जूनपर्यंत आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून प्राचार्य लॉगिनमधून आपला अर्ज ‘रिव्हर्ट बॅक’ करून घेणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर या तारखेच्या आतच विद्यार्थ्यांच्या लाॅगइनमधून ऑनलाइन फेरसादर करावा लागणार आहे.

ऑनलाइन फेर सादर करणे गरजेचेविद्यार्थ्यांना या दोन दिवसांतच महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून प्राचार्य लॉगइनमधून अर्ज ‘रिव्हर्ट बॅक’ करून घ्यावा लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल. ‘रिव्हर्ट बॅक’ झालेला अर्ज याच मुदतीत विद्यार्थ्यांच्या लाॅगइनमधून ऑनलाइन फेर सादर करणे गरजेचे आहे. ३० जूननंतर ‘रिव्हर्ट बॅक’ची सुविधा आणि सन २०२३-२४ साठी आतापर्यंत परिपूर्ण अर्ज सादर करण्याची मुदत संपुष्टात येणार आहे, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. जी. वाबळे यांनी कळविले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती