शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘एसईबीसी’ऐवजी ‘खुला’; ‘आयटीआय’ प्रवेशासाठी मराठा आरक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:15 IST

दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन अर्ज मागविले होते.

ठळक मुद्देप्रवेशफेरीला ३ डिसेंरपासून सुरुवात 

औरंगाबाद : ‘आयटीआय’ची पहिली प्रवेशफेरी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे संपूर्ण प्रवेशप्रक्रियाच ठप्प झाली होती. तथापि, ज्या विद्यार्थ्यांनी ‘आयटीआय’साठी ‘एसईबीसी’ प्रवर्गातून ऑनलाईन अर्ज केले होते. त्यांनी आपल्या अर्जात खुला प्रवर्ग अशी दुरुस्ती करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. 

दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन अर्ज मागविले होते. त्यानुसार उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी पहिल्या फेरीसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, ९ ते १४ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित करण्यात आले होते. 

मराठवाड्यातील शासकीय व खाजगी ‘आयटीआय’मध्ये एकूण १९ हजार ३४४ प्रवेशक्षमतेपैकी पहिल्या फेरीत ३ हजार ५८४ प्रवेश झाले होते. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली; परंतु मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करताना तो ‘एसईबीसी’ या प्रवर्गातून केला होता. त्यामुळे दुसरी फेरी स्थगित करण्यात आली होती. आता राज्य शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ‘आयटीआय’साठी ऑनलाईन अर्जात दुरुस्ती करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ज्या उमेदवारांनी ‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज केला असेल, त्यांनी प्रवेश अर्जात खुला प्रवर्ग अशी दुरुस्ती करायची आहे. 

प्रवेशफेरीला ३ डिसेंरपासून सुरुवात दुसऱ्या प्रवेशफेरीला ३ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवड यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाणार असून ४ डिसेंबर रोजी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. ५ ते ८ डिसेंबरदरम्यान निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व प्रवेशनिश्चित केला जाणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी ११ डिसेंबर रोजी संस्था व निवड यादी जाहीर केली जाईल. १२ ते १५ डिसेंबरदरम्यान तिसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत. १२ ते १५ डिसेंबर दरम्यान, चौथ्या फेरीसाठी विकल्प सादर करता येतील. १८ डिसेंबर रोजी चौथ्या फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची संस्था व व्यवसायनिहाय यादी जाहीर होईल. चौथ्या प्रवेशफेरीअखेर रिक्त जागांवर समुपदेशनाद्वारे २९ व ३० डिसेंबर रोजी प्रवेश दिले जाणार आहेत. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादiti collegeआयटीआय कॉलेजStudentविद्यार्थी