शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अवघा ८ महिन्यांचा संसार; पत्नीने घरी गळफास घेतल्याचे समजताच पतीनेही संपवले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:18 IST

अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झाला होता विवाह; पत्नीने घरी, तर पतीने पुलाखाली घेतला गळफास

सिल्लोड (जि. औरंगाबाद) : तालुक्यातील घटांब्री येथील नवविवाहित दाम्पत्याने रविवारी (दि.११) वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. अगोदर पत्नीने राहत्या घरी साडेअकरा वाजता गळफास घेतला, तर पोस्टमास्तर असलेल्या पतीने दीड वाजता बोजगाव येथील खेळणा नदीच्या पुलाखाली गळफास घेतला. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या या दाम्पत्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. विकास गणपत तायडे (वय २६) व सपना विकास तायडे (२१) अशी त्यांची नावे आहेत.

घटांब्री येथील रहिवासी तथा चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड) येथे पोस्टमास्तर असलेल्या विकास गणपत तायडे यांचा विवाह आठ महिन्यांपूर्वी एप्रिल २०२२ रोजी दहिगाव येथील सपनासोबत झाला होता. काही दिवसांपासून ते दोघे कुटुंबीयांपासून वेगळी खोली करुन अलिप्त राहत होते. दोघांचाही संसार सुखाचा सुरू असताना अचानक रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सपनाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यावेळी विकास तायडे हे सिल्लोडला मोटारसायकलची सर्व्हिसिंग करण्यासाठी गेलेले होते. त्यांना पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी कळताच त्यांनीसुद्धा रस्त्याने परत येताना अंभईजवळील बोजगाव येथील खेळणा नदीच्या पुलाखाली दुपारी १ वाजेच्या सुमारास गळफास घेतला.

या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे सपोनि. अजित विसपुते, बीट जमादार नीलेश शिरस्कर आदींनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या दोघा पती-पत्नीने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. रविवारी रात्री घटांब्री येथे दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी