शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पाऊस

By admin | Updated: July 23, 2014 00:23 IST

किशोरसिंह चौव्हाण, मुखेड यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात १९७२ सारखी दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असे चित्र आहे. मागील दीड महिन्यांत तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

किशोरसिंह चौव्हाण, मुखेडयंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात १९७२ सारखी दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असे चित्र आहे. मागील दीड महिन्यांत तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत मुखेड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे.मागील १५ वर्षांच्या काळात झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सागवान, चंदन, शिंदी, लिंब, बाभूळ आदी झाडांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाल्याने तेवढीच कत्तल तालुक्यात सुरु आहे. तालुक्यात एकमेव लेंडी नदी वाहते. या नदीवर धरण बांधण्याचे काम मागील तीस वर्षांपासून सुरु आहे. धरण अर्धवट अवस्थेत आहे. तालुक्यात कुंद्राळा, तामखेड, चांडोळा आदींसह १० ते १५ लघु तलाव आहेत. या तलावात १५ ते २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यात ७६ हजार ८०० हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, ८ हजार सिंचनेक्षत्र आहे. दरवर्षी जून महिन्यात पाऊस झाला की, पेरण्यांची लगबग सुरु होते. यंदा मात्र उलट परिस्थिती आहे. १० जुलै २०१४ रोजी तालुक्यातील मुक्रमाबाद, बाऱ्हाळी, जांब, मुखेड या भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली. पुढे पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती, मात्र झाले उलटेच. पाऊसच आला नाही. १० जुलैच्या पावसाने तालुक्यात ३० टक्के पेरणी पूर्ण झाली. २९.९७ हेक्टरवर ज्वारी, ४ हजार २६४ हेक्टरवर सोयाबीन, १ हजार ७६७ हेक्टरवर कापूस, १३ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर उडीद, १ हजार ३४४ हेक्टरवर मुग, ८ हेक्टरवर बाजरी, १३ हेक्टरवर मका एवढी पेरणी तालुक्यात झाली. पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात ८८ हजार ३०७ जनावरांची संख्या असून, ३३ हजार ५१० जनावरे आहेत. ५४ हजार ७९७ मोठी जनावरे आहेत. चार महिन्यांत गतवर्षीपेक्षा २५ ते ३० टक्क्यांनी जनावरांची संख्या घटल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. या जनावरांना दरमहा १२ हजार ८७० मेट्रीक टन चारा लागणार आहे, अशीच परिस्थिती राहिल्यास डिसेंबर २०१४ पर्यंत २ लाख ५७ हजार ४०० मे. टन चारा लागणार आह तर ३१ मे २०१५ पर्यंत ५ लाख १४ हजार ८०० मेट्रीक टन चारा लागेल. सध्या तालुक्यात २१ जुलैपर्यंत ३४ हजार ४५३ मे.टन चारा शिल्लक आहे. हा चारा ८० दिवस पुरेल. यंदा जनावरांच्या चाऱ्यासह जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल, मागील वर्षी ज्वारीचा पेरा अल्प झाल्याने शेतकऱ्यांकडे ज्वारी शिल्लक राहिली नाही. वाडी-तांड्यावर १५ जुलैपासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. तालुक्यातील ३० गावे, २१ वाडी ताड्यांना १२ टँकरने पाणीपुरवठा केला जातो.७६ विहीर, बोअर अधिग्रहण करुन वाडी- तांड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. जाणकार आणि जुन्या पिढीतील नागरिकांच्या म्हणण्यानुसार अशीच स्थिती १९७२ मध्ये निर्माण झाली होती. मागील ११ वर्षांतील पाऊस २००४ मध्ये ९०२ मि.मी, २००५ मध्ये ९०० मि.मी, २००६ मध्ये ८१० मि.मी., २००७-०८ मध्ये ६७९, २००८ मध्ये ६३५, २००९ मध्ये ३८९, २०१० - ८८६, २०११- ७४२, २०१२-५९४, २०१३-१०५१ आणि २० जुलैपर्यंत २०१४ पर्यंत केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद तालुक्यात झाली. पेरणीचे दिवस संपले आहेत. आता तर उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन, कापूस आदी पिकेही येणे अवघड आहे तर मागील ११ वर्षांत २१ जुलैपर्यंत २००४-२०२ मि.मी, २००५-३०३, २००६-१३२, २००७-१५५, २००८-१२६, २००९-८६, २०१०-२४०, २०११-२४६, २०१२-२८९, २०१३-४८१ पाऊस झाला होता.