शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

औरंगाबाद मनपाच्या अजब त-हा; कचरा तुंबल्याचा राग काढला सफाई मजुरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:36 PM

कचरा न उचलल्याने एका सफाई मजुरावर थेट निलंबनाची कारवाई सोमवारी महापालिका आयुक्तांनी केली. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष आहे.

ठळक मुद्दे शहरात मागील चार महिन्यांपासून कचरा पडून आहे. जागोजागी कचऱ्याचे मोठमोठे डोंगर साचले आहेत.

औरंगाबाद : शहरात मागील चार महिन्यांपासून कचरा पडून आहे. जागोजागी कचऱ्याचे मोठमोठे डोंगर साचले आहेत. हजारो मेट्रिक टन कचरा पावसाच्या पाण्याने अक्षरश: सडून दुर्गंधी पसरली आहे. ज्याठिकाणी कचऱ्याच्या पर्वतरांगा उभारण्यात आल्या आहेत, त्या भागातील नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत असतानाही महापालिका प्रशासन काहीच धोरणात्मक निर्णय घेण्यास तयार नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेला कचरा सफाई कर्मचाऱ्यांनी उचलून टाकावा कुठे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कचरा न उचलल्याने एका सफाई मजुरावर थेट निलंबनाची कारवाई सोमवारी महापालिका आयुक्तांनी केली. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष आहे.

नारेगाव येथे चार महिन्यांपासून कचरा टाकणे बंद आहे. शहरातील कचऱ्याची स्थिती सफाई मजूर आपल्या पद्धतीने रेटून नेत आहेत. काही वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून कचऱ्यावर प्रक्रियाही करण्यात येत आहे. २,५०० सफाई मजुरांच्या मेहनतीमुळे शहरात अद्याप तरी रोगराई पसरलेली नाही. वेळोवेळी कचरा उचलून ठिकठिकाणी टाकणे, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मदत करणे, आदी कामे मनपाच्या सफाई मजुरांनीच केली.  शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने घाटी रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा पडून होता. या भागात मनपा आयुक्तY डॉ. निपुण विनायक गेले असता त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. महापालिकेची घंटागाडी येत नाही म्हणून आम्ही कचरा नाईलाजास्तव रोडवर टाकतो, असेही नागरिकांनी सांगितले. त्यावरून या भागातील सफाई मजूर गौतम बबन कांबळे याला सोमवारी  निलंबित करण्यात आले.

निरीक्षक, वॉर्ड अधिकाऱ्यांना अभयमनपा प्रशासनाने कचराप्रश्नी एकट्या सफाई मजुरावर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घाटी रोडवरील जयभीमनगर परिसरात घंटागाडी येत नाही, हे पाहण्याचे काम स्वच्छता निरीक्षकाचे आहे. त्यानेही कर्तव्यात कसूर केल्यास वॉर्ड अधिकारी आहेत. या दोघांना अभय का देण्यात आले. त्यांच्यावरही कारवाई करायला हवी होती, असे मनपातील कामगार संघटनांचे म्हणणे आहे. 

एका वॉर्डासाठी तीन रिक्षाजयभीमनगर घाटी या वॉर्डासाठी मनपा प्रशासनाने तीन रिक्षा दिल्या आहेत. कंत्राटदाराच्या या रिक्षा असून, एका रिक्षाचे भाडे दरमहा २९ हजार रूपये देण्यात येत आहे. तीन रिक्षांचे दरमहा भाडे जवळपास ९० हजार रूपये  होते. या भागात कचरा नेणारी रिक्षाच येत नसेल तर त्याला दोषी सफाई मजूर कसा? कंत्राटदार रिक्षा न पाठविता बिल वसूल करतोय का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न