शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

पोस्टल बँकेत एक हजार ग्रामस्थांनी उघडले खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 11:03 PM

पाटोदा येथे सोमवारी टपाल विभागातर्फे डिजीटल इंडिया उपक्रमाची जनजागृती करण्यात आली.

वाळूज महानगर : पाटोदा येथे सोमवारी टपाल विभागातर्फे डिजीटल इंडिया उपक्रमाची जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांतर्गत टपाल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी गावातील जवळपास १ हजार ग्रामस्थांचे टपाल कार्यालयात खाते उघडण्यात आले आहे.

भारत सरकारतर्फे चार वर्षांपासून डिजीटल इंडिया हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोमवारी पाटोदा येथे टपाल विभागाच्यावतीने जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक बी.के.राहुल, सहा.अधीक्षक अनिल साळुंके, गणेश कुलकर्णी, गजेंद्र जाधव, बबन गरड, सुभाष सुखधान, गणेश मरमट, सरपंच भास्कर पेरे, उपसरपंच विष्णू राऊत, ग्रामविकास अधिकारी पी.एस.पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात राहुल, अनिल साळुंके, गणेश कुलकर्णी यांनी पोस्ट पेमेंट बँक, आधार नोंदणी, पोस्टल लाईफ इन्श्युरन्स, डिजीटल उत्पादने आदींविषयी नागरिकांना माहिती दिली. देशभरात १ लाख ५५ हजार टपाल कार्यालये असून, यातील ९० टक्के कार्यालये ही ग्रामीण भागात आहेत. कार्यक्रमाला भारत गवळी, विशाल मांडे, अरुण आरगडे, दिपाली पेरे आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आठवडाभरापासून उपक्रमडिजीटल इंडिया उपक्रमाविषयी टपाल विभागाच्या वतीने आदर्श पाटोदा गावात आठवडाभरपासून जनजागृती करण्यात येत आहे. विविध योजनांची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी टपाल विभागात खाते उघडण्यास सुरवात केली आहे. शून्य शिलकीवर खाते उघडले जात असल्याने गावातील महिला व ग्रामस्थांची खाते उघडण्यासाठी गर्दी होत आहे. आठवडाभरात ७५० महिला व २४७ पुरुषांनी खाते उघडल्याची माहिती सरपंच भास्कर पेरे, ग्रामविकास अधिकारी पी.बी.पाटील यांनी दिली.

टॅग्स :WalujवाळूजPost Officeपोस्ट ऑफिस