शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
7
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
8
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
9
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
10
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
11
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
12
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
13
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
14
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
15
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
16
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
17
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
18
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
19
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
20
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
Daily Top 2Weekly Top 5

‘एक दिवस शरद पवारांना देखील ‘पुतण्या’ आठवेल!’; गोपीनाथ मुंडेंची भविष्यवाणी खरी ठरली!

By नंदकिशोर पाटील | Updated: April 24, 2024 11:47 IST

भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले अजितदादा ‘टायमिंग’ साधतील का, हा खरा उत्सकतेचा विषय आहे.

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्राच्या राजकारणात तसे अनेक ‘दादा’ लोक आहेत. पण सध्या चर्चा आहे एकाच दादांची ते म्हणजे, अजितदादा! राज्य मंत्रिमंडळात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपदाचा सांभाळण्याचा एक आगळा विक्रम नावावर असलेले अजित पवार सध्या काकांकडून पळविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर लोकसभा निवडणुकीत उतरले आहेत. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले अजितदादा ‘टायमिंग’ साधतील का, हा खरा उत्सकतेचा विषय आहे.

१३ जून २०१३ साली गोपीनाथ मुंडे यांचे एक भाषण औरंगाबाद (तेव्हाचे) शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात झाले होते. व्यासपीठावर विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. विनायकराव मेटे यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. या समारंभात मुंडे यांनी जोरदार भाषण केले. हसून-हसून उपस्थितांची पुरेवाट झाली. विषय पुतण्याचा निघाला. त्यावर मुंडे म्हणाले, ‘हल्ली राज्यातील पुतणे मंडळींना काय झालेय हेच कळेना! जो तो उठतो आणि मला वेगळं व्हायचंय म्हणतो!’ गोपीनाथरावांच्या या वाक्यावर सभागृहात जो हशा आणि टाळ्यांचा कडकडाटा झाला, तो आजही एकनाथ रंगमंदिरात घुमतो आहे. मुंडे पुढे जे बोलले ते खूप म्हत्त्वाचे आहे. ते म्हणाले, ‘लिहून घ्या, एक दिवस शरद पवारांना देखील ‘पुतण्या’ आठवेल!’ गोपीनाथरावांची ही भविष्यवाणी अकरा वर्षांनंतर खरी ठरली! आज मुंडे असते, तर त्यांनी हा किस्सा नक्कीच ऐकवला असता.

असो. शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याच्या तालमीत वाढलेल्या, त्यांच्याकडूनच राजकारणातील डावपेच शिकलेल्या अजित पवारांनी आपल्या काकांवर नव्हे तर, राजकीय गुरूंवर असा डाव टाकला की, गुरूंची तालीम आणि तालमीतील बहुसंख्य शिष्यगण पळवले! शिवाय, तालमीला स्वत:चे नावही लावले. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अनेकांनी बंड केले. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती अजित पवारांच्या बंडखोरीची! का नाही होणार? महाराष्ट्रातील मुंडे, मोहिते, नाईक, निंबाळकर या सारखी मोठी घराणी फुटली तरी, पवार घराण्यात दुभंग निर्माण होईल आणि अजित पवार कुटुंबातून बाहेर पडतील, अशी कल्पना देखील कोणी केली नव्हती. पण भाजपच्या चाणक्यांनी डावपेच आखले आणि अजितदादांचे पाऊल उंबऱ्याबाहेर पडले!

पक्ष फोडल्याची बक्षिसी काय?अजित पवार यांना राष्ट्रवादी फोडल्याची बक्षिसी म्हणून उपमुख्यमंत्रिपद आणि आठ मंत्रिपदं मिळाली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात त्यांच्या वाट्याला केवळ पाच जागा आल्या आहेत. त्यातही परभणीची जागा रासपचे महादेव जानकर यांना गेली आहे, तर शिरूरमध्ये शिवसेनेचे आढळराव पाटील यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी लागली. उस्मानाबादमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी द्यावी लागली. उरल्या फक्त दोन जागा. बारामती आणि रायगड. तिथे अनुक्रमे पत्नी सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे हे दोनच उमेदवार खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नऊ आमदार, तरी जागा एकचराष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर मराठवाड्यातील तब्बल नऊ आमदार (विधान परिषदेवरील दोघांसह) अजित पवार यांच्यासोबत गेले. बीडचे संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार शरद पवार यांच्यासोबत राहिले. वास्तविक, मराठवाडा हा शरद पवारांना मानणारा प्रदेश आहे. १९७८ साली पुलोद सरकार स्थापन केले तेव्हा माजलगावचे सुंदरराव सोळंके यांना उपमुख्यमंत्रिपद दिले होते. असे असताना या प्रदेशातील बहुसंख्य आमदार अजित पवारांसोबत गेले. मात्र आमदारांच्या संख्येच्या तुलनेत त्यांना मराठवाड्यात केवळ उस्मानाबादची जागा मिळाली. तिथेही उमेदवार आयात करावा लागला. वास्तविक, परभणीत त्यांच्याकडे राजेश विटेकर यांच्यासारखा सक्षम उमेदवार होता. मागील निवडणुकीत विटेकर यांनी चांगली लढत दिली होती. परभणीत वंचितचा उमेदवार नसता तर विटेकर विजयी झाले असते. मात्र, बारामतीत धनगर समाजाची मते मिळावीत म्हणून ही जागा आता रासपच्या महादेव जानकरांना देण्यात आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत. बीडचे बजरंग सोनवणे यांनी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवली. बीडमधील अजितदादांच्या तीन आमदारांना भाजपचा प्रचार करावा लागणार आहे.

टॅग्स :baramati-pcबारामतीbeed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४aurangabad-pcऔरंगाबाद