शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बापरे! शहराशेजारचे डोंगर चोरीला; माफियांच्या प्रतापाने पर्यावरणावर मोठा घाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 19:20 IST

पर्यावरणासह सुरक्षेच्या दृष्टीने हे डोंगर अतिशय महत्त्वाचे होते.

- शेख मुनीरछत्रपती संभाजीनगर : शहराच्या चारही बाजूंनी शासकीय मालकीचे डोंगर पोखरण्यात येत आहेत. अगोदरच रस्त्यांसाठी डोंगराची कत्तल करण्यात आलेली असतानाच आता गौण खनिज माफियांचा सगळीकडे सुळसुळाट झाला आहे. किरकोळ रक्कम भरून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची तस्करी करण्यात येत आहे. गौण खनिजाचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आतमध्ये असलेला खडकही फोडून त्यापासून बांधकामासाठी लागणारी कच (क्रश सेंट) तयार करून विकण्यात येत आहे. हा सर्व व्यवसाय शासन, प्रशासन आणि माफियांच्या संगनमताने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर वसवितानाच चारही बाजूंनी डोंगर असल्याचे निवडण्यात आले होते. त्यामुळे पर्यावरणासह सुरक्षेच्या दृष्टीने हे डोंगर अतिशय महत्त्वाचे होते. या डोंगररांगामध्ये वेरूळच्या लेणी, विद्यापीठ लेणी, दौलताबाद किल्ला उभारण्यात आलेला आहे. या डोंगरांमधून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नहरींचे जाळे विणण्यात आले होते. मात्र, आता हेच डोंगर संपूर्णपणे नष्ट होत चालले आहेत. याची खंत ना प्रशासला वाटते, ना राजकीय नेत्यांना. सर्वांची मिलिभगत असून, त्यातून गौण खनिज माफियांचा उदय झाला आहे.

शहराचे पर्यावरण धोक्यातशहरातील पर्यावरणप्रेमींनी बैठक घेऊन डोंगर पोखरण्याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही काळ काम थांबले होते. आपल्या शहराची डोंगर संस्कृती (हील इकॉलॉजी) नष्ट होत आहे. आधीच समृद्धी मार्ग, धुळे-सोलापूर, अजिंठा रस्त्यासाठी डोंगर फोडलेले आहेत. आता राजकारण्याचे नातेवाईक चारही बाजूंनी डोंगर गौण खनिजासाठी पोखरत आहेत. याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष आहे. गौण खनिज माफिया आणि प्रशासनाची मिलीभगत असल्यामुळे हा प्रकार वाढतच आहे. या प्रकारामुळे शहराचे पर्यावरण धोक्यात आले आहे.- किशोर पाठक, पर्यावरणाचे अभ्यासक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारीenvironmentपर्यावरण