शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गावाची एकी, प्रगती पाहून वृद्ध दाम्पत्य भारावले; भेटीनंतर शाळेला दिले १० संगणक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 19:44 IST

औरंगाबाद येथील वृद्ध दाम्पत्याचा मोठेपणा

ठळक मुद्देवाकी ग्रामस्थांशी साधला संवाद गावाची संस्कृती जाणून घेत असताना शाळेलाही मदत

चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील वाकी या निर्मल ग्रामाला पाहण्यासाठी व ग्रामीण भागातील संस्कृती, शेती जाणून घेण्यासाठी औरंगाबाद येथील एक वृद्ध व्यावसायिक दाम्पत्याने गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान गावाने विकास कामात व ग्रामस्वच्छतेत अल्पावधीत घेतलेली भरारी व विविध उपक्रम पाहून या दाम्पत्याने शाळेला १० संगणक भेट म्हणून दिले.

औरंगाबाद येथील व्यावसायिक मजहर हुसेन व तस्सनीम बानो हुसेन यांनी कन्नड तालुक्यातील वाकी येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक यादव जंजाळ यांच्याकडे शेती व ग्रामीण भागातील संस्कृतीची माहिती जाणून घेण्यासाठी गावाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर या दाम्पत्याने १ जानेवारी रोजी गावाला भेट दिली. यावेळी गावातील स्वच्छतेसाठी राबविलेले इतर उपक्रम पाहून गावासाठी काहीतरी निधी देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. गावासाठी काय हवे? असा प्रश्नही त्यांनी ग्रामस्थांना विचारला. ग्रामस्थांनीही गावासाठी काही नको. द्यायचे असेल तर शाळेला संगणक द्या, असे सुचविले. त्यानंतर मजहर हुसेन यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. मुलांची शिक्षणाविषयीची ओढ जाणून घेतल्यानंतर शाळेला १० संगणक भेट देण्याचा शब्द देऊन त्यासाठी लागणारा निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दरवर्षी शाळेला भेट देण्यासाठी येणार असल्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखविला. शाळेला १० संगणक मिळणार असल्याने विद्यार्थीही आनंदी झाले.  ग्रामस्थांनीही या दाम्पत्याचा सत्कार केला. यावेळी मजहर हुसैन, तस्सनीम बानो हुसैन, श्रीराम जंजाळ, यादवराव गुरुजी, पोलीस पाटील शिवाजी तरळ, मुख्याध्यापक एस. के. चव्हाण, शिंदे, डवणे, शेळके, योगेश जंजाळ आदींची उपस्थिती होती. 

गावाने पटकावले अनेक पुरस्कारवाकी गावाने स्मार्ट ग्राम योजना अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षातील १० लाख रुपयांचा तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार, २०१६-१७ वर्षातील निर्मल ग्राम पुरस्कार तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यात आता जिल्हा स्मार्ट ग्राम योजना अभियानांतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी गावाचा सहभाग असल्याने गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आहे.

गावाची एकी पाहून भारावून गेलो ग्रामस्वच्छतेत गावाने घेतलेली गरूडझेप, गावात झालेली विकासकामे, तसेच गावाची एकी पाहून भारावून गेलो आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने वाकी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा.राजकीय हेवेदावे बाजूला ठेवले तर प्रत्येक गाव हगणदारीमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी मजहर हुसैन व तस्सनीम बानो हुसैन या दाम्पत्याने व्यक्त केला.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीSocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद