शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

अरे बापरे, सहा टक्के लोक मेंटल ! शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिक मानसिक ताणतणावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 20:12 IST

मानसिक आजाराची लक्षणे काय? जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत समाजातील सर्वच घटकांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे.

औरंगाबाद :आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजाराने त्रस्त आहेत. चार कुटुंबांतील किमान एक माणूस मानसिक आजारी असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीचे पूर्ण मानसिक संतुलन बिघडले तर त्या व्यक्तीला ‘मेंटल’ म्हणून हिणविले जाते. मात्र, वेळीच उपचार केला तर मानसिक आजार बरा होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटले.

जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत समाजातील सर्वच घटकांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. शहरी भाग मानसिक आजाराला बळी पडत असताना ग्रामीण भागातही मानसिक आजाराचे लोण पसरत आहे. शाळकरी मुले ते ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच मानसिक ताण-तणावाला सामोरे जावे लागते पण अजूनही मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घेण्याची मानसिकता नाही.

चार कुटुंबांतील किमान एकजण जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार चार कुटुंबातील किमान एकजण मानसिक आजारी आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ नुसार, २० पैकी एक भारतीय व्यक्ती डिप्रेशनचा बळी ठरतो.

‘मेंटल’ची लक्षणे काय? स्वत:विषयी भ्रामक कल्पना, अतिताण घेणे, सर्वजण माझ्याविरोधात आहे, असे सतत वाटणे, नशेच्या आहारी जाणे, चित्त एकाग्र न होणे, कामात चुका, ही लक्षणे आहेत. आजूबाजूच्या लोकांना ही व्यक्ती पूर्वीपेक्षा वेगळी वागत असल्याचे जाणवते.

मानसिक आजार वाढण्याला कारण काय? अनुवंशिकता, अतितणाव, नशेच्या पदार्थांचे सेवन, झोप कमी होणे, झेपत नाही अशी कामे करणे, ही काही कारणे मानसिक आजारवाढीला कारणीभूत ठरतात. बेरोजगारी, शिक्षण, घरगुती अडचणी, व्यसनाधीनता नैराश्यामागील कारणे आहेत.

कोणी तपासण्या करून घ्यायला हव्यात? मानसिक आजाराची कोणतीही लक्षणे जाणवत असेल आधी जवळच्या व्यक्तीशी, कुटुंबीयांशी मनमोकळे बोलले पाहिजे. आवश्यक वाटल्यास फॅमिली फिजिशियनचा सल्ला घेतला पाहिजे तरीही फरक पडत नसेल तर वेळीच शेवटी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सहानुभूतीने पाहावे मनोरुग्णांकडे सहानुभूतीने पाहावे. आजार अंगावर काढता कामा नये. घाटीत मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागात मानसिक आजाराच्या रुग्णांवर उपचार केले जातात.- डाॅ. प्रसाद देशपांडे, मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागप्रमुख, घाटी

ओपीडीत वाढबाह्यरुग्ण विभागात मानसिक आजारांच्या रुग्णांची संख्या गेल्या दिवसांत वाढलेली आहे. नैराश्य, चिंता यासह काही मानसिक आजार समुपदेशनाने बरे होतात. पाचपैकी एक व्यक्ती नैराश्यग्रस्त असते.- डाॅ. महेश मरकड, चिकित्सालयीन मानसतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य