शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

अरे बापरे, सहा टक्के लोक मेंटल ! शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिक मानसिक ताणतणावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 20:12 IST

मानसिक आजाराची लक्षणे काय? जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत समाजातील सर्वच घटकांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे.

औरंगाबाद :आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजाराने त्रस्त आहेत. चार कुटुंबांतील किमान एक माणूस मानसिक आजारी असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीचे पूर्ण मानसिक संतुलन बिघडले तर त्या व्यक्तीला ‘मेंटल’ म्हणून हिणविले जाते. मात्र, वेळीच उपचार केला तर मानसिक आजार बरा होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटले.

जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत समाजातील सर्वच घटकांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. शहरी भाग मानसिक आजाराला बळी पडत असताना ग्रामीण भागातही मानसिक आजाराचे लोण पसरत आहे. शाळकरी मुले ते ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच मानसिक ताण-तणावाला सामोरे जावे लागते पण अजूनही मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घेण्याची मानसिकता नाही.

चार कुटुंबांतील किमान एकजण जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार चार कुटुंबातील किमान एकजण मानसिक आजारी आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ नुसार, २० पैकी एक भारतीय व्यक्ती डिप्रेशनचा बळी ठरतो.

‘मेंटल’ची लक्षणे काय? स्वत:विषयी भ्रामक कल्पना, अतिताण घेणे, सर्वजण माझ्याविरोधात आहे, असे सतत वाटणे, नशेच्या आहारी जाणे, चित्त एकाग्र न होणे, कामात चुका, ही लक्षणे आहेत. आजूबाजूच्या लोकांना ही व्यक्ती पूर्वीपेक्षा वेगळी वागत असल्याचे जाणवते.

मानसिक आजार वाढण्याला कारण काय? अनुवंशिकता, अतितणाव, नशेच्या पदार्थांचे सेवन, झोप कमी होणे, झेपत नाही अशी कामे करणे, ही काही कारणे मानसिक आजारवाढीला कारणीभूत ठरतात. बेरोजगारी, शिक्षण, घरगुती अडचणी, व्यसनाधीनता नैराश्यामागील कारणे आहेत.

कोणी तपासण्या करून घ्यायला हव्यात? मानसिक आजाराची कोणतीही लक्षणे जाणवत असेल आधी जवळच्या व्यक्तीशी, कुटुंबीयांशी मनमोकळे बोलले पाहिजे. आवश्यक वाटल्यास फॅमिली फिजिशियनचा सल्ला घेतला पाहिजे तरीही फरक पडत नसेल तर वेळीच शेवटी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सहानुभूतीने पाहावे मनोरुग्णांकडे सहानुभूतीने पाहावे. आजार अंगावर काढता कामा नये. घाटीत मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागात मानसिक आजाराच्या रुग्णांवर उपचार केले जातात.- डाॅ. प्रसाद देशपांडे, मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागप्रमुख, घाटी

ओपीडीत वाढबाह्यरुग्ण विभागात मानसिक आजारांच्या रुग्णांची संख्या गेल्या दिवसांत वाढलेली आहे. नैराश्य, चिंता यासह काही मानसिक आजार समुपदेशनाने बरे होतात. पाचपैकी एक व्यक्ती नैराश्यग्रस्त असते.- डाॅ. महेश मरकड, चिकित्सालयीन मानसतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य