शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अरे बापरे, सहा टक्के लोक मेंटल ! शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिक मानसिक ताणतणावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 20:12 IST

मानसिक आजाराची लक्षणे काय? जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत समाजातील सर्वच घटकांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे.

औरंगाबाद :आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजाराने त्रस्त आहेत. चार कुटुंबांतील किमान एक माणूस मानसिक आजारी असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीचे पूर्ण मानसिक संतुलन बिघडले तर त्या व्यक्तीला ‘मेंटल’ म्हणून हिणविले जाते. मात्र, वेळीच उपचार केला तर मानसिक आजार बरा होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटले.

जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत समाजातील सर्वच घटकांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. शहरी भाग मानसिक आजाराला बळी पडत असताना ग्रामीण भागातही मानसिक आजाराचे लोण पसरत आहे. शाळकरी मुले ते ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच मानसिक ताण-तणावाला सामोरे जावे लागते पण अजूनही मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घेण्याची मानसिकता नाही.

चार कुटुंबांतील किमान एकजण जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार चार कुटुंबातील किमान एकजण मानसिक आजारी आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ नुसार, २० पैकी एक भारतीय व्यक्ती डिप्रेशनचा बळी ठरतो.

‘मेंटल’ची लक्षणे काय? स्वत:विषयी भ्रामक कल्पना, अतिताण घेणे, सर्वजण माझ्याविरोधात आहे, असे सतत वाटणे, नशेच्या आहारी जाणे, चित्त एकाग्र न होणे, कामात चुका, ही लक्षणे आहेत. आजूबाजूच्या लोकांना ही व्यक्ती पूर्वीपेक्षा वेगळी वागत असल्याचे जाणवते.

मानसिक आजार वाढण्याला कारण काय? अनुवंशिकता, अतितणाव, नशेच्या पदार्थांचे सेवन, झोप कमी होणे, झेपत नाही अशी कामे करणे, ही काही कारणे मानसिक आजारवाढीला कारणीभूत ठरतात. बेरोजगारी, शिक्षण, घरगुती अडचणी, व्यसनाधीनता नैराश्यामागील कारणे आहेत.

कोणी तपासण्या करून घ्यायला हव्यात? मानसिक आजाराची कोणतीही लक्षणे जाणवत असेल आधी जवळच्या व्यक्तीशी, कुटुंबीयांशी मनमोकळे बोलले पाहिजे. आवश्यक वाटल्यास फॅमिली फिजिशियनचा सल्ला घेतला पाहिजे तरीही फरक पडत नसेल तर वेळीच शेवटी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सहानुभूतीने पाहावे मनोरुग्णांकडे सहानुभूतीने पाहावे. आजार अंगावर काढता कामा नये. घाटीत मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागात मानसिक आजाराच्या रुग्णांवर उपचार केले जातात.- डाॅ. प्रसाद देशपांडे, मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागप्रमुख, घाटी

ओपीडीत वाढबाह्यरुग्ण विभागात मानसिक आजारांच्या रुग्णांची संख्या गेल्या दिवसांत वाढलेली आहे. नैराश्य, चिंता यासह काही मानसिक आजार समुपदेशनाने बरे होतात. पाचपैकी एक व्यक्ती नैराश्यग्रस्त असते.- डाॅ. महेश मरकड, चिकित्सालयीन मानसतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य