गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या ३५ वर
By Admin | Updated: July 12, 2016 01:08 IST2016-07-12T00:34:32+5:302016-07-12T01:08:09+5:30
औरंगाबाद : शहर आणि लगतच्या भागांमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा ३५ वर गेला आहे.

गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या ३५ वर
औरंगाबाद : शहर आणि लगतच्या भागांमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा ३५ वर गेला आहे. त्यामुळे जनजागृती आणि विविध उपाययोजना राबवूनही गॅस्ट्रोचा उद्रेक कायम असल्याचे दिसते. शहर आणि लगतच्या भागातील साथरोगांच्या परिस्थितीची सोमवारी आरोग्य मंत्र्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून सूचना केल्या.
घाटी रुग्णालयात जुलै महिन्यातील ९ तारखेपर्यंत गॅस्ट्रोचे २८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. अवघ्या दोन दिवसांत ही संख्या ३५ वर गेली. घाटी रुग्णालयात वर्षभर गॅस्ट्रोचे रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. तर खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या यापेक्षा अधिक आहे. सोमवारी आरोग्य विभागाची बैठक पार पडली. यावेळी साथरोगांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. शहरातील साथरोगांची विशेषत : गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या पाहता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जनजागृती, अतिसार नियंत्रण पंधरवड्यासह विविध उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. मंगळवारपासून त्यामध्ये आणखी वाढ केली जाणार आहे. दूषित पाणीपुरवठा टाळण्यासाठी गळक्या जलवाहिनीसंदर्भात काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असून, आरोग्य मंत्र्यांनी चौकशी केल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहास जगताप यांनी सांगितले.