शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

आता शिवसेना ठाकरे गटाने फक्त एक खासदार निवडून आणावा; गिरीश महाजनांचे आव्हान

By बापू सोळुंके | Updated: December 4, 2023 12:28 IST

खा. संजय राऊत हे तर वाचाळवीर, निवडणूक निकालातून त्यांना चपराक; महाजनांची सडकून टीका

छत्रपती संभाजीनगर : गेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि भाजपची युती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावामुळे ठाकरे गटाचे १८ खासदार, विधानसभेत ५५ आमदार निवडून आले. आता त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फक्त एक खासदार निवडून आणून दाखवावा. असे आव्हान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी दिले. चार राज्यांपैकी तीन राज्यात भाजपने मुसंडी मारल्यानंतर भाजप विभागीय कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांची यावेळी उपस्थिती होती.

ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांची निवडणुकीच्या निकालावर काही प्रतिक्रिया आली नाही. यावर महाजन म्हणाले, ते वाचाळवीर असून त्यांना निकालामुळे मोठी चपराक बसली आहे. त्यांनी या निवडणुकीवरून बेताल वक्तव्ये केली, ते आता तोंडघशी पडले आहेत.

देशाला पनौती कुणाची आहे आणि गॅरंटी कुणाची आहे. हे निकालावरून दिसले आहे. तेलंगणा भाजपच्या हातून का गेले, त्या राज्यात आमचे काहीही काम नव्हते. संघटन देखील मजबूत नव्हते. त्यामुळे आम्ही तेथे निवडून येऊ, असा दावा केला नव्हता. उर्वरित तीन राज्यांवर आमचा दावा होता. काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा कोणताही परिणाम निवडणुकीवर नव्हता, इंडिया आघाडीचा पराभव झाला असून एक्झिट पोल फोल ठरले आहेत. लोकसभेची पूर्वपरीक्षा झाली असून भाजपचे ३४० ते ३५० खासदार लोकसभेत निवडून येतील. राज्यातही भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येईल. असा दावा त्यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे....मराठा समाजाला कायदा, नियमांत बसणारे आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. २४ डिसेंबरनंतर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे. यावर महाजन म्हणाले, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु सरकार ओबीसी समाजासह कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. जरांगे यांची सरसकट आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होणे शक्य नाही. सर्वोच्च न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट आहे, असे महाजन म्हणाले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनAurangabadऔरंगाबादSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा