शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

...आता वारसदारांच्या संमतीनंतरच होणार रिक्षाच्या परमिटचे हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 6:13 PM

परस्पर परमिट हस्तांतराच्या प्रकारांना आळा बसत आहे.

ठळक मुद्देकुटुंबाची परवड थांबविण्याचा प्रयत्न वर्षभरात ११० परमिटचे हस्तांतर

औरंगाबाद : रिक्षा आणि रिक्षाचे परमिट म्हणजे उदरनिर्वाहाचे माध्यम. मात्र, अनेक जण व्यसन, कर्जापोटी कुटुंबाला कोणतीही कल्पना न देता परमिट परस्पर विकून टाकतात. हा प्रकार थांबविण्यासाठी आरटीओ कार्यालयात रिक्षाचे परमिट हस्तांतर करताना कुटुंबातील वारसदारांची परवानगी घेण्यात येत आहे. त्यातून परस्पर परमिट हस्तांतराच्या प्रकारांना आळा बसत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात रिक्षांची संख्या तब्बल २५ हजारांवर गेली आहे. अनेकदा व्यसन, कर्ज आणि अन्य कारणांमुळे परमिट दुसऱ्याला देण्यात येते. अशावेळी घरातील लोकांना माहिती देण्यात येत नाही. त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडतात. परमिट हस्तांतर करताना कुटुंबातील सदस्याचा साधा विचारही केला जात नाही. त्यामुळे परमिट हस्तांतर झाल्यानंतर अनेक जण आरटीओ कार्यालयात धाव घेत होते. परस्पर हस्तांतर झालेल्या परमिटविषयी आक्षेप घेत होते. हा प्रकार रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी परमिट हस्तांतरच्या वेळी पत्नी, मुलगा, वडील यासह वारसदार हजर राहण्याची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. प्रारंभी याला रिक्षाचालकांनी विरोध केला; परंतु त्यामागील कारण स्पष्ट झाल्यानंतर आता या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. 

परवड थांबविण्याचा प्रयत्नपरस्पर परमिट हस्तांतर केल्यामुळे अनेकांची परवड होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळेच रिक्षा परमिट हस्तांतरच्या वेळी कुटुंबातील प्रमुखाला, नातेवाईकांची संमती बंधनकारक केली. गेल्या वर्षभरात ११० रिक्षांचे हस्तांतर झाले.

चांगला निर्णय रिक्षा म्हणजे एक प्रकारे मालमत्ता, उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे परमिट हस्तांतरण करताना वारसदारांची परवानगी घेणे, हा अतिशय चांगला निर्णय आहे, असे रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान म्हणाले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादFamilyपरिवार