शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

आता पॅन कार्ड असेल, तरच ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती; विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर

By विजय सरवदे | Updated: April 17, 2024 13:30 IST

‘व्हीपीडीए’ नवीन प्रणाली लागू :  या शिष्यवृत्ती योजनेसाठी मागील आठवड्यात शासनाने काही बदल केले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : कधी अपुऱ्या निधीमुळे, तर कधी अर्जातील त्रुटींमुळे शैक्षणिक वर्ष लोटले, तरीही विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती प्रतीक्षाच करावी लागायची. आता या शिष्यवृत्तीसाठी ‘पॅन कार्ड’ आणि ‘कॅन्सल चेक’ जमा करण्याची अट लागू केल्यामुळे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.

इयत्ता अकरावी, बारावी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे उच्चशिक्षण घेत असलेले मागासवर्गीय विद्यार्थी जे गुणवत्ता असतानाही शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशापासून वंचित आहेत, अशा विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. अनेक विद्यार्थी किरायाने खोली घेऊन शिक्षण घेतात. अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी साधारपणे ५१ हजार रुपयांपर्यंत ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, सरकारी काम अन् सहा महिने थांब, या उक्तीचा प्रत्यय मागील अनेक वर्षांपासून ‘स्वाधार’च्या लाभार्थी विद्यार्थ्यांना येत आहे. शैक्षणिक वर्ष सरल्यानंतरही दोन-दोन वर्षे ही शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या शिष्यवृत्ती योजनेसाठी मागील आठवड्यात शासनाने काही बदल केले आहेत. पूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम समाज कल्याण सहायक आयुक्तांच्या खात्यावर जमा व्हायची, ती आता थेट कोषागारे कार्यालयात ‘व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट’मध्ये (व्हीपीडीए) जमा होणार आहे. समाज कल्याण विभागाने सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी कोषागारे कार्यालयाकडे सादर होईल. त्यासाठी पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना लिंक केलेले पॅन कार्ड आणि आधार कार्ड, एक कॅन्सल चेक समाज कल्याण कार्यालयात जमा करावा लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे बँकेत वैयक्तिक खाते आहे; पण अनेकांकडे धनादेशाची सुविधा नाही. सर्वांकडे आधार कार्ड आहे, पण पॅन कार्ड काढलेले नाही. त्यामुळे या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत.

निधी प्राप्त आला अन् नवीन अटी लागू झाल्याशैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चे नियमित विद्यार्थी तसेच तत्पूर्वीच्या वर्षात त्रुटीत निघालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण विभागाकडे मार्च अखेर १९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची तयारी सुरू असतानाच ‘व्हीपीडीए’ ही नवीन पद्धत लागू झाली. त्यामुळे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांना नवीन प्रणालीद्वारेच शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्ती