शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आता पॅन कार्ड असेल, तरच ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती; विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर

By विजय सरवदे | Updated: April 17, 2024 13:30 IST

‘व्हीपीडीए’ नवीन प्रणाली लागू :  या शिष्यवृत्ती योजनेसाठी मागील आठवड्यात शासनाने काही बदल केले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : कधी अपुऱ्या निधीमुळे, तर कधी अर्जातील त्रुटींमुळे शैक्षणिक वर्ष लोटले, तरीही विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती प्रतीक्षाच करावी लागायची. आता या शिष्यवृत्तीसाठी ‘पॅन कार्ड’ आणि ‘कॅन्सल चेक’ जमा करण्याची अट लागू केल्यामुळे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.

इयत्ता अकरावी, बारावी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे उच्चशिक्षण घेत असलेले मागासवर्गीय विद्यार्थी जे गुणवत्ता असतानाही शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशापासून वंचित आहेत, अशा विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. अनेक विद्यार्थी किरायाने खोली घेऊन शिक्षण घेतात. अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी साधारपणे ५१ हजार रुपयांपर्यंत ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, सरकारी काम अन् सहा महिने थांब, या उक्तीचा प्रत्यय मागील अनेक वर्षांपासून ‘स्वाधार’च्या लाभार्थी विद्यार्थ्यांना येत आहे. शैक्षणिक वर्ष सरल्यानंतरही दोन-दोन वर्षे ही शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या शिष्यवृत्ती योजनेसाठी मागील आठवड्यात शासनाने काही बदल केले आहेत. पूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम समाज कल्याण सहायक आयुक्तांच्या खात्यावर जमा व्हायची, ती आता थेट कोषागारे कार्यालयात ‘व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट’मध्ये (व्हीपीडीए) जमा होणार आहे. समाज कल्याण विभागाने सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी कोषागारे कार्यालयाकडे सादर होईल. त्यासाठी पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना लिंक केलेले पॅन कार्ड आणि आधार कार्ड, एक कॅन्सल चेक समाज कल्याण कार्यालयात जमा करावा लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे बँकेत वैयक्तिक खाते आहे; पण अनेकांकडे धनादेशाची सुविधा नाही. सर्वांकडे आधार कार्ड आहे, पण पॅन कार्ड काढलेले नाही. त्यामुळे या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत.

निधी प्राप्त आला अन् नवीन अटी लागू झाल्याशैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चे नियमित विद्यार्थी तसेच तत्पूर्वीच्या वर्षात त्रुटीत निघालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण विभागाकडे मार्च अखेर १९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची तयारी सुरू असतानाच ‘व्हीपीडीए’ ही नवीन पद्धत लागू झाली. त्यामुळे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांना नवीन प्रणालीद्वारेच शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्ती