शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

पैसे भरूनही टँकर येत नाही; हजारो महिलांचे टँकरकडे दिवसरात्र डोळे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 3:18 PM

फोन केला तर टँकर पाठविल्याचे सांगितले जाते; पण टँकर काही येत नाही.

ठळक मुद्देवीजपुरवठा बंद असल्याने टँकरमध्ये पाणी भरणा बंद पडला होता.अनेक भागातील पाणीपुरवठा ठप्प झाल्याने विविध भागांतील नागरिक जलकुंभावर

औरंगाबाद : ‘दिवसा तर वाट पाहतोच परंतु रात्री ११ वाजेपर्यंत रांगा लावून टँकरची वाट पाहत बसतो. मात्र, फेरीचा दिवस असूनही पाण्याचे टँकर येत नाही. फोन केला तर टँकर पाठविल्याचे सांगितले जाते; पण टँकर काही येत नाही. नागरिकांचे पाणी व्यावसायिकांना विकण्याचा सर्रास उद्योग सुरू आहे, असा आरोप करीत सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारीही (दि.३०) विविध भागातील नागरिकांनी सिडको, एन-५ येथील जलकुंभावर संताप व्यक्त केला. 

जलवाहिनी नसलेल्या भागांमध्ये महानगरपालिका टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करते. त्यासाठी नागरिकांकडून दर तीन महिन्यांनी पैसे भरले जातात; परंतु पैसे भरूनदेखील सहा-सहा दिवस टँकर फिरकत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या सहा दिवसांपासून टँकर आलेला नसल्याने मंगळवारी सकाळी ११ वाजता हनुमाननगर येथील महिलांनी एन-५ येथील जलकुंभ गाठले. याठिकाणी महापालिकेचा एकही कर्मचारी हजर नसल्याचे पाहून महिलांनी एकच संताप व्यक्त केला. अशा परिस्थितीत टँकरला डिझेलपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला, टँकरचालकाला महिलांनी घेराव घालत जाब विचारला. मात्र, त्यांनी आपली कशीबशी सुटका करून घेतली. यापाठोपाठ विश्रांतीनगर येथील नागरिकही याठिकाणी दाखल झाले.

या भागात चार दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नव्हता. त्यानंतर भारतनगर, राजनगर, शिवनेरी कॉलनी, गजानननगर, चिकलठाणा भागातील नागरिकांनीही संताप व्यक्त करीत याठिकाणी धाव घेतली. टँकर कधी पाठविता, अशी विचारणा नागरिकांकडून होत होती; परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी मनपाचे कोणीही अधिकारी हजर नव्हते. येथील शिपायाने वीजपुरवठा बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर महिला संताप व्यक्त करीत माघारी फिरल्या. पाणी मात्र मिळालेच नाही. 

टँकरच्या रांगा, टँकरचालकांना विचारणावीजपुरवठा बंद असल्याने टँकरमध्ये पाणी भरणा बंद पडला होता. परिणामी, टँकरच्या रांगा लागलेल्या होत्या. विविध भागांतून येणारे नागरिक टँकरचालकांना विचारणा करीत होते; परंतु टँकरचालक नागरिकांच्या घोळक्यातून सुटका करून घेत होते.

टँकरचालकांचे थंब घ्यावेज्या वसाहतींसाठी टँकर निघते, त्या भागात टँकर पोहोचत नाही. ते मध्येच कुठेतरी रिकामे होते. त्यामुळे एखाद्या वसाहतीसाठी टँकर रवाना होण्यापूर्वी टँकरचालकांचे हाताचे थंब घ्यावे, म्हणजे टँकर त्याच भागात पोहोचेल आणि मध्येच कुठे गायब होणार नाही, असे नागरिकांनी म्हटले. 

पाच दिवस लोटलेपैसे भरूनही पाण्याचे टँकर येत नाही. पाच दिवस उलटले तरीही टँकर आलेले नाही. रांगा लावून वाट पाहण्याची वेळ येत आहे. नागरिकांना पाठविण्यात येणारे टँकर कोणाला तरी विकले जात असल्याची शंका वाटते. भरण्यात येणाऱ्या पैशांच्या तुलनेत किमान १५ ड्रम पाणी मिळाले पाहिजे; परंतु ११ ते १२ ड्रमच पाणी मिळते.- बेबी खंडारे, हनुमाननगर

पाण्याविना दिवससहा-सहा दिवस टँकर येत नाही. आता आज वीजपुरवठा बंद असल्याने एकही टँकर भरणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आजचा दिवसही पाण्याविना गेला. किमान उद्या तरी टँकर येतील, अशी अपेक्षा आहे.    - सी.एस. शिंदे, गजानननगर 

या भागातील नागरिक आले जलकुंभावर :भारतनगरहनुमाननगरविश्रांतीनगरराजनगरशिवनेरी कॉलनीजयभवानीनगरचिकलठाणा

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईcidco aurangabadसिडको औरंगाबाद