‘गाळात’ अडकले मनपा अधिकारी

By Admin | Updated: April 27, 2016 00:35 IST2016-04-27T00:11:09+5:302016-04-27T00:35:05+5:30

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी विशेष बाब म्हणून औरंगाबाद महापालिकेला हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा घसघशीत निधी उपलब्ध करून दिला.

NMC officer stuck in 'Ghat' | ‘गाळात’ अडकले मनपा अधिकारी

‘गाळात’ अडकले मनपा अधिकारी

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी विशेष बाब म्हणून औरंगाबाद महापालिकेला हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा घसघशीत निधी उपलब्ध करून दिला. नेहमीप्रमाणे मनपा अधिकारी ‘गाळ’काढण्यास नकारघंटा वाजवत होते. मंगळवारी सकाळी ६ वाजता विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी हर्सूल तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. तलावाची परिस्थिती गाळ काढण्यासारखी असून, त्वरित गाळ काढण्याचे काम सुरू करा, असे आदेशही विभागीय आयुक्तांनी दिले.
दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने निधी दिल्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी गाळ काढण्याचे टेंडर काढण्यास उशीर केला. ऐन पावसाळ्यात गाळ काढण्याचे टेंडर काढले. हर्सूल तलावात मुबलक पाणी असताना गाळ कसा काढणार, असा प्रश्न नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे पुढील उन्हाळ्यापर्यंत हे काम पुढे ढकलण्यात आले. यंदा उन्हाळा लागला तरी मनपा अधिकाऱ्यांकडून गाळ काढण्यासाठी कोणत्याही हालचाली सुरू करण्यात आल्या नाहीत. एप्रिल महिना संपत आला आहे.

Web Title: NMC officer stuck in 'Ghat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.