शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

औरंगाबादसाठी १,६८० कोटींची नवी पाणीपुरवठा योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 2:25 PM

योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होताच सेना-भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राज्यमंत्री अतुल सवे यांनी केली घोषणा 

ठळक मुद्दे जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २,४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी शहरात २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल. ही योजना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाईल.

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न अवघ्या ५५ दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविला. शहरासाठी नवीन १,६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आज मंजूर केली. या योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी करताच सायंकाळी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी सेना-भाजप पदाधिकाऱ्यांसोबत एका भरगच्च पत्रकार परिषदेत नवीन पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अवघ्या पाचच दिवसांत निविदा प्रसिद्ध करणार आहे. तीन वर्षांमध्ये योजना पूर्ण होईल. योजनेला शंभर टक्केशासन अनुदान असल्याचेही जाहीर करण्यात आले.

समांतर जलवाहिनीचा प्रकल्प रद्द केल्यानंतर आजही सर्वोच्च न्यायालयात मनपाविरुद्ध कंपनी, असा वाद सुरू आहे. पाण्याअभावी शहरातील लाखो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा, अशी मागणी अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना वैयक्तिक लक्ष घालून ही योजना पूर्ण करावी, अशी सूचना दिली. अवघ्या ५५ दिवसांमध्ये विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत फाईल सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचली. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्वाक्षरी केल्याचे सावे यांनी नमूद केले.

२०५०-५२ पर्यंत औरंगाबादसह आसपासच्या खेड्यांची लोकसंख्या किमान ३५ ते ४० लाख होणार आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी योजनेचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेत जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २,४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, शहरात २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, नक्षत्रवाडी येथे नवीन एमबीआर बनविणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामांचा समावेश आहे. ही योजना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाईल. पहिला टप्पा पंधरा वर्षांचा राहील. या टप्प्यात शहराला ४५१ एमएलडी पाणी मिळेल. त्यानंतर पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल. नवीन पाणीपुरवठा योजनेत सातारा, देवळाईसह महापालिका हद्दीतील सर्व भागांचा समावेश करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत पालिका हद्दीचे क्षेत्रफळ १७६ वर्ग कि.मी. एवढे आहे. या सर्व भागात एकूण २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येतील. नवीन पाणीपुरवठा योजनेत सर्वाधिक खर्च ५३३ कोटी रुपये मुख्य जलवाहिनीसाठी, २७३ कोटीअंतर्गत जलवाहिन्यांसाठी आणि २५४ कोटी शुद्धीकरण केंद्र व तेथून पुढे जलकुंभापर्यंत जलवाहिन्यांसाठी लागणार आहेत.

मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी यावेळी नमूद केले की, नक्षत्रवाडीत मोठे एमीबीआर तयार करण्यात येईल. तेथून एकूण ५ जलवाहिन्या शहरात येतील. सध्या शहरात २७ जुन्या टाक्या आहेत. नवीन ५२ टाक्या तयार करण्यात येतील. पत्रकार परिषदेला उपमहापौर विजय औताडे, सभापती जयश्री कुलकर्णी, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, सभागृहनेता विकास जैन, माजी महापौर बापू घडमोडे, गजानन बारवाल, शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, नगरसेवक दिलीप थोरात, प्रमोद राठोड, मकरंद कुलकर्णी, शिवाजी दांडगे आदींची उपस्थिती होती. 

उद्धव ठाकरेंनी साकडे घातले म्हणून१७ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीनिमित्त औरंगाबादेत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडवा म्हणून मुख्यमंत्र्यांना साकडे घातले होते. त्यांच्यामुळेच ही योजना मार्गी लागल्याचा दावा आज पत्रकार परिषदेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला.

नवीन पाणीपुरवठा योजनेचे स्वरूप१,६८० कोटी योजनेचा संपूर्ण खर्च. ५३३  कोटी मुख्य जलवाहिनीसाठी.

२,४५०  मि.मी.व्यासाची मुख्य जलवाहिनी.२७३  कोटीअंतर्गत जलवाहिन्यांसाठी.

२७   टाक्या जुन्या वापरणार२५   नवीन टाक्या बांधणार.

६६० मीटर उंचीवर नक्षत्रवाडीत नवा एमबीआर.७००  किलोमीटरच्या नव्या अंतर्गत जलवाहिन्या.

०८ कोटी दरमहा विजेचा खर्च येणार.२०५० इ.स. डोळ्यासमोर ठेवून योजनेचे डिझाईन.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकारAtul Saaveअतुल सावे