शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

'ना अपक्ष, ना कोणाला पाठिंबा'; औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून विनोद पाटील यांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 17:59 IST

मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे आज जाहीर केले. आज दुपारी समर्थकांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली. तसेच निवडणुकीत कोणत्याही उमेदवारास पाठिंबा देणार नसून तटस्थ राहणार असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणूक जाहीर होताच विनोद पाटील यांनी औरंगाबाद लोकसभेतून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. महायुतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. मात्र, भाजप आणि शिंदेसेनात औरंगाबादची जागा प्रतिष्ठेचा मुद्दा झाला. अखेर शिंदेसेनेला जागा सुटून महायुतीकडून पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतरही विनोद पाटील निवडणूक लढणार यावर ठाम होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी नागपूर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी देखील त्यांनी निवडणूक लढणारच याचा पुनरुच्चार केला होता. त्याच दिवशी अचानक संदीपान भूमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

दरम्यान, मी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवावी अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. मी निवडणूक लढवली पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण शहरातील सत्ताधारी दोन आमदार आणि एक खासदाराने मला उमेदवारी देऊ नयेत, यासाठी टोकाचा विरोध केला, असा आरोप विनोद पाटील यांनी केला. तसेच उदय सामंत यांनी देखील भेटू घेऊन, तुम्ही आता थांबा, अशी विनंती केली. विजयाचे गणित माझ्याकडे असल्याचे सांगिताच सामंत यांनी ते माझ्या हातात नाही असे म्हंटले. त्यानंतर आज समर्थकांची बैठक घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढवली पाहिजे असा आग्रह शहरवासीयांनी धरला होता. त्यामुळे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, असेही पाटील म्हणाले.

अपक्ष निवडणूक लढली तरी विजय...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून महायुतीकडून निवडणूक लढवण्यास सांगितले. कालही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत माझं बोलणं झालं. मागील दोन तीन दिवसांत मी नागरिकांशी चर्चा केली. मी अपक्ष निवडणूक लढवल्यास मी निवडून येऊ शकतो, पण निवडून आलो नाही तर कुणाला तरी पाडण्यासाठी उभा होता हा डाग मला लावून घ्यायचा नाही. मी कुणाला फायदा व्हावा यासाठी माघार घेत नाही. उद्यापासून लोकांची भेट घेणार आहे. त्यांचे प्रश्न सोडवणार आहे. मी नाक रगडून लोकांची माफी मागतो, मी सार्थ ठरलो नाही, असेही ते म्हणाले.  ज्यांची घर काचेची असतात त्यांनी लोकांच्या घरावर दगड मारू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४