शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

नेहरू भवनच्या जागी होणार भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स; दिल्लीची एजन्सी करतेय विकास आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:27 IST

शहरातील सांस्कृतिक चळवळींची गरज म्हणून नगरपालिकेच्या काळात सुमारे चाळीस वर्षांपूर्वी नेहरू भवन उभारले होते.

ठळक मुद्देया कामासाठी ३० कोटींचा खर्च पंधरा कोटी केंद्र शासनाकडून मिळणार

औरंगाबाद : नेहरू भवनची इमारत पाडून त्याजागी टीव्ही सेंटरच्या धर्तीवर व्यापारी संकुल विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वर्षभरापूर्वीच सर्वसाधारण सभेने यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. दिल्लीच्या एजन्सीकडून यासंबंधीचा प्रकल्प विकास आराखाडा तयार केला जात आहे. एकूण ३० कोटी रुपये खर्चून हे व्यापारी संकुल उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे, याकामी केंद्र सरकारकडून पालिकेला १५ कोटींचा निधीही मिळण्याची शक्यता आहे.

मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी नेहरू भवनच्या प्रकल्प आराखड्याविषयी शुक्रवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. शहरातील सांस्कृतिक चळवळींची गरज म्हणून नगरपालिकेच्या काळात सुमारे चाळीस वर्षांपूर्वी नेहरू भवन उभारले होते. याठिकाणी नाटक, मुशायरा, गझलांच्या अनेक मैफली दिग्गज रंगकर्मींनी गाजविल्या. मात्र, मागील काही वर्षांपासून ते अडगळीत पडले होते. इमारतीचा वापरही बंदच आहे. येथील खुली जागा लग्न, खासगी समारंभासाठी वापरली जात आहे. त्यातून पालिकेला उत्पन्नही कमीच मिळते, तर इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीवर जास्तीचा खर्च होतो. म्हणून ही इमारत पाडून त्याजागी प्रेक्षकगृह, समारंभ हॉल व व्यापारी संकुल तयार करण्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून डीपीआर तयार करण्यासाठी दिल्लीच्या एजन्सीची नियुक्‍ती केली. याविषयी आयुक्‍त पाण्डेय यांनी सांगितले की, दिल्लीच्या अनुभवी एजन्सीकडून नेहरू भवनचा डीपीआर तयार केला जात आहे. या कामासाठी एकूण ३० कोटींचा खर्च येत आहे. त्यापैकी १५ कोटींचा निधी हा केंद्र सरकारकडून विशेष योजनेतून मिळणार आहे. उर्वरित १५ कोटींचा निधी पालिकेच्या माध्यमातून टीव्ही सेंटरच्या धर्तीवर गाळेधारकांकडून उभा केला जाईल.

प्रकल्पाचा खर्च दुप्पटनेहरू भवनाची जागा ही ४ हजार ५० चौरस मीटर एवढी आहे. त्यात २६ दुकाने, २४ व्यापारी कार्यालये, प्रेक्षकगृह आणि मेजवानी हॉल, वाहनतळ, असे सुरुवातीचे नियोजन होते. याकामी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरसूचीनुसार अपेक्षित खर्च सुमारे १३ कोटी एवढा गृहीत धरून पालिकेला अपेक्षित उत्पन्न १७ कोटी रुपये मिळेल, असे वर्षभरापूर्वी ठरले होते. मात्र, आता याकामी तब्बल ३० कोटी रुपये खर्च येत आहे.

प्रशासनाकडून शिफारस अमान्यडीपीआर तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्‍त करण्यासाठी निविदा प्रक्रियेत चार ते पाच कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यात दिल्लीची एजन्सी वगळता इतर एजन्सींना काम देण्यासाठी शहरातून काही ‘खास’ व्यक्‍तींच्या शिफारशी आल्या होत्या. या शिफारशी प्रशासनाकडून धुडकावून लावण्यात आल्या.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादfundsनिधी