शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

सामाजिक परिवर्तनासाठी बहुजन समाजाने एकोप्याने चळवळ पुढे नेण्याची गरज

By admin | Updated: April 14, 2016 00:58 IST

जालना : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज या महामानवांनी तमाम बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी चळवळ करून

जालना : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज या महामानवांनी तमाम बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी चळवळ करून प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. मात्र हिंदुत्वाच्या जोखडात सापडलेला बहुजन समाजही त्याच रूढी, परंपरेत अडकलेला आहे. त्यामुळे महापुरूषांना अभिपे्रत असा समाज अद्यापही निर्माण झालेला नाही. सामााजिक परिवर्तनासाठी बहुजन समाजाने एकोप्याने चळवळ करण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते अ‍ॅड. बी. एम. साळवे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला बोलताना सांगितले. आपण १९५८ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयात अकरावीत प्रवेश घेतला. शिक्षणाबरोबरच समाज जागृतीसाठी विविध कार्यक्रमांतून चळवळीशी संबंध आला. पँथरच्या माध्यमातून शिष्यवृत्ती आंदोलनासह विविध आंदोलनात सहभाग नोंदविला. पुढे १९८३ पासून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत भारिप संघटनेशी जोडलो गेलो. त्या माध्यमातून अनेक चळवळी उभ्या केल्या भूमीहीनांसाठी गायरान जमिनी देण्यासाठी चळवळ उभी करून त्या माध्यमातून अनेक भूमीहीन हे जमीनदार झाले. हा लढा अजूनही सुरूच असल्याचे सांगून ते म्हणाले की, आज दलित, बहुजन समाज हा विखूरला गेला आहे.त्यामुळे सामाजिक चळवळीला मरगळ आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. स्वार्थ आडवा आल्यामुळेच रिपब्लिकनमध्ये गट-तट निर्माण झाले.त्याचा इतर पक्ष हे आपल्या फायदा घेत आहे. डॉ. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला जगण्याचे बळ दिले. आज वाचन संस्कृती गायब झाली. टीव्ही, मोबाईल मध्येच तरूण तासन्तास गुंतून राहतोय. वाचन नसल्याने तरूण दिशाहीन झाले आहेत. कोणतेही धोरण ठरवित नाहीत. तरूणांनी डॉ. आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या त्रिसूत्रांचा अंमल करण्याचे आवाहन त्यांनी केले. शब्दांकन- गंगाराम आढाव