शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सामाजिक परिवर्तनासाठी बहुजन समाजाने एकोप्याने चळवळ पुढे नेण्याची गरज

By admin | Updated: April 14, 2016 00:58 IST

जालना : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज या महामानवांनी तमाम बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी चळवळ करून

जालना : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज या महामानवांनी तमाम बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी चळवळ करून प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. मात्र हिंदुत्वाच्या जोखडात सापडलेला बहुजन समाजही त्याच रूढी, परंपरेत अडकलेला आहे. त्यामुळे महापुरूषांना अभिपे्रत असा समाज अद्यापही निर्माण झालेला नाही. सामााजिक परिवर्तनासाठी बहुजन समाजाने एकोप्याने चळवळ करण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते अ‍ॅड. बी. एम. साळवे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला बोलताना सांगितले. आपण १९५८ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयात अकरावीत प्रवेश घेतला. शिक्षणाबरोबरच समाज जागृतीसाठी विविध कार्यक्रमांतून चळवळीशी संबंध आला. पँथरच्या माध्यमातून शिष्यवृत्ती आंदोलनासह विविध आंदोलनात सहभाग नोंदविला. पुढे १९८३ पासून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत भारिप संघटनेशी जोडलो गेलो. त्या माध्यमातून अनेक चळवळी उभ्या केल्या भूमीहीनांसाठी गायरान जमिनी देण्यासाठी चळवळ उभी करून त्या माध्यमातून अनेक भूमीहीन हे जमीनदार झाले. हा लढा अजूनही सुरूच असल्याचे सांगून ते म्हणाले की, आज दलित, बहुजन समाज हा विखूरला गेला आहे.त्यामुळे सामाजिक चळवळीला मरगळ आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. स्वार्थ आडवा आल्यामुळेच रिपब्लिकनमध्ये गट-तट निर्माण झाले.त्याचा इतर पक्ष हे आपल्या फायदा घेत आहे. डॉ. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला जगण्याचे बळ दिले. आज वाचन संस्कृती गायब झाली. टीव्ही, मोबाईल मध्येच तरूण तासन्तास गुंतून राहतोय. वाचन नसल्याने तरूण दिशाहीन झाले आहेत. कोणतेही धोरण ठरवित नाहीत. तरूणांनी डॉ. आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या त्रिसूत्रांचा अंमल करण्याचे आवाहन त्यांनी केले. शब्दांकन- गंगाराम आढाव