शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शेतकऱ्यांच्या मताची विभागणी करण्यासाठी राज्यात नवीन दुकान आणले; जयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र

By बापू सोळुंके | Updated: June 18, 2023 19:09 IST

राज्यसरकार कुचकामी असल्याने शेतकऱ्यांना तेलंगणात कांदा विक्री करावी लागत आहे

बापू सोळुंके, छत्रपती संभाजीनगर: सरकार आल्यापासून कापसाचे दर १३ हजारावरून साडेसहा हजारावर आले, मिळत नसल्यामुळे कांदा, टमाटे शेतकऱ्यांना रस्तावर फेकून द्यावे लागले. राज्यातील शेतकरी निवडणुकीची वाटपच पहात आहे. शेतकरी आपल्याबद्दल नाराजी व्यक्त करतील, हे सरकारच्या लक्षात आले आहे. शेतकऱ्यांची मते विभागणीसाठी सरकारने राज्यात एक नवीन (बीआरएस)दुकान आणले,असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे केला.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय कक्षाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित, विचारवंत रावसाहेब कसबे, लोकमतचे पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटी, रा.काँ. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, संयोजक जयदेव गायकवाड, प्रा. सुनील मगरे, प्रा.प्रतिभा अहिरे,अभिषेक देशमुख आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, फुले,शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांनी समाजसुधारण्यासाठी काम केले. या कामामुळे मुठभर लोकांची अडचण झाली. या सर्व महापुरूषांच्या प्रतिमा मोडल्या पाहिजे यासाठी काम गेले काही दिवस सुरू आहे. कधी राज्यपाल बोलले असतील तर कधी आमदार बाेलले असतील. याचा अर्थ तुमच्याआमच्या श्रद्धेवर हातोडा मारण्याचे काम अप्रत्यक्ष कोणीतरी करतेय.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखी राजवट असती तर, त्या राज्यपालाला मुसक्या बांधून परत त्याच्या राज्यात परत पाठविण्याची व्यवस्था झाली असती. आज येथे विचारवंताची मांदीयाळी सतत व्हायला हवी.अशा शिबिरांचे आयोजन व्हायला हवे, पक्ष तुमच्या पाठिशी आहे, असे त्यांनी नमूद केले. आज दिवसभरात विचारवंत संपादक संजय आवटे, रावसाहेब कसबे, डाॅ.प्रल्हाद लुलेकर, लेखिका प्रतिभा अहिरे,प्रा,सुरेंद्र जाेंधळे यांनी विचार मांडले. प्रा.सुनील मगरे यांनी प्रास्तविक करताना पक्षाच्या फादर बॉडीकडून सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांची दखल घेतली जात नाही,अशी खंत व्यक्त केली. शिवाय आगामी काळात पक्ष सत्तेत आल्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळाव,अशी अपेक्षा व्यक्त केली.

राज्यसरकार कुचकामी असल्याने शेतकऱ्यांना तेलंगणात कांदा विक्री करावी लागत आहेतेलंगणामध्ये कांदा कांद्याचा दर जोपर्यंत तेलंगणामध्ये चांगला आहे तोपर्यत शेतकरी तिकडे जात राहतील. राज्यसरकारने तेलंगणा एवढा दर राज्यात मिळेल यासाठी काळजी घेणे आवश्यक होते. राज्यसरकार कुचकामी असल्याने येथील शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी तेलंगणा राज्यात जावे लागत आहे. मात्र याचा अर्थ लाेक बीआरएसला मते देतील असा होत नाही,असे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती