शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नाशिकचे पाणी जायकवाडीत दाखल; २४ तासात पाणीपातळीत मोठी वाढ; पाणीसाठा ४० टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 19:50 IST

आजही नाशिक जिल्ह्यास पावसाने झोडपून काढल्याने धरणात येणारी आवक वाढती राहील

पैठण (औरंगाबाद): नाशिकच्या पुराचे पाणी दाखल झाल्याने गेल्या २४ तासात जायकवाडीच्या पाणीपातळीत पाऊन फुटाने वाढ झाली असून ५६.१९ दलघमी ( २ टीएमसी) पाण्याची भर पडली आहे. मंगळवारी रात्री धरणात ४५९३८ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू होती. वरच्या धरणातील विसर्ग लक्षात घेता आवक वाढणार असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. दरम्यान धरणाचा जलसाठा मंगळवारी सायंकाळी ४०%  पेक्षा जास्त झाला होता.

नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी सोमवारी मध्यरात्री जायकवाडी धरणात येऊन धडकले. जायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टी सुरू असून तेथील धरणातून गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू आहेत. जायकवाडी धरणात मंगळवारी सकाळपासून  आवक वाढत असल्याचे दिसून आले सायंकाळी ७ वाजेस धरणात ४५९३८ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. आवक वाढणार असल्याने धरणाच्या पाणीपातळीत गतीने वाढ होणार असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. 

मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील धरण समुहापैकी दारणा धरणातून १५०८८ क्युसेक्स, कडवा धरणातून ३५१७ क्युसेक्स, गंगापूर धरणातून १००३५ क्युसेक्स असा मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत होता.  या सर्व धरणातील पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात येते. तेथून गोदावरी पात्रात ७८२७६ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने गोदावरी पात्रात मंगळवारी विसर्ग  वाढविण्यात आल्याने गोदावरी नदीला पुर आला आहे. प्रशासनाने नाशिक ते गंगापूर पर्यंत गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरी नदी ६२८०० क्युसेक्स क्षमतेने वहात असल्याची माहिती धरण अभियंता विजय काकडे यांनी दिली. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणी पातळी मंगळवारी रात्री ७ वा १५०८.७५ फूट  ईतकी झाली होती. धरणात उपयुक्त जलसाठा ८६१.८६४ दलघमी झाला होता. आजही नाशिक जिल्ह्यास पावसाने झोडपून काढल्याने धरणात येणारी आवक वाढती राहील असे धरण नियंत्रण कक्षातून सहायक अभियंता गणेश खराडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद