शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

Namantar Andolan: ‘माझं अख्खं कुटुंबच नामांतर लढ्यात, आई-वडिलांना कारावासही झाला’ : संजय जगताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:56 PM

लढा नामविस्ताराचा : मी त्यावेळी लहान होतो. भडकलगेटजवळील मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये आठवी-नववीत शिकत होतो. तरीही विद्यार्थी  चळवळीत सक्रिय होतो. तसं तर नामांतराच्या लढ्यात माझं अख्खं कुटुंबच होतं आणि त्यांनी केलेला मोठा संघर्षही मी जवळून पाहत होतो, असं भारतीय दलित पँथरचे नेते संजय जगताप यांनी सांगितलं. 

- स. सो. खंडाळकर

भारतीय दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष असलेले संजय जगताप यांनी एकेकाळी औरंगाबादची महापालिका गाजवली आहे. दलित पँथरच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडणे, त्यासाठी संघर्ष करणे, आंदोलने करणे हा जणू त्यांचा स्थायीभावच बनून गेला आहे. संजय जगताप हे आक्रमक पँथर म्हणून ओळखले जातात.

संजय जगताप हे नामांतराच्या प्रश्नावर बोलत होते आणि ते ऐकून त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई जगताप उद्गारल्या, मीबी त्या लढ्यात होतेच की अन् ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकात लाँगमार्च-सत्याग्रहासाठी आलेल्या कितीतरी कार्यकर्त्यांना मी माझ्या हातची बेसन-भाकरी खाऊ घातली होती. 

माझे वडील दिवंगत उत्तमराव जगताप, आजोबा सदाशिवराव जगताप, हे सारे नामांतराच्या लढ्यात होते. क्रांतीचौकातील सत्याग्रहात माझ्या आई-वडिलांना अटक झाली. त्यांना हर्सूल कारागृहात नेऊन ठेवलं. पुढं माझाही या लढ्यातला सहभाग वाढला. मोर्चा काढला म्हणून पोलिसांनी अटक केली. हर्सूल जेलमध्ये नेऊन दिवसभर ठेवलं गेलं आणि सायंकाळी सोडून देण्यात आलं होतं. या मोर्चात जयभीमनगरचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते, अशी एक आठवण जगताप यांनी ताजी केली. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते.

त्यांनी सांगितले की, १९९४ साली शरद पवार हे मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय होत होता. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी पोलीस यंत्रणा घेत होती. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर जणू पाळतच होती. नामविस्तार झाला आणि आम्ही कार्यकर्ते जयभीमनगरात मिठाई वाटत सुटलो. एवढा आनंद आम्हाला झाला होता.नामविस्तार झाला; पण विद्यापीठाची प्रगती म्हणावी तशी झाली नाही. साऱ्या वादंगांना बाजूला सारून विद्यापीठाची प्रगती महत्त्वाची वाटते. ही प्रगतीच खऱ्या अर्थानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आदरांजली ठरणार आहे. या प्रगतीसाठी आता पुन्हा एकदा एकत्रित येऊन विचार करण्याची व प्रसंगी संघर्ष करण्याची गरज असल्याची कळकळही जगताप यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा