शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

Namantar Andolan : नामांतरविरोधी असूनही गोविंदभाई म्हणाले, तू तुझ्या भूमिकेवर ठाम राहा : श्रीराम जाधव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:09 PM

लढा नामविस्ताराचा : मी नाशिकच्या जेलमधून बाहेर पडून औरंगाबादला आलो आणि आणखी एका केसमध्ये मला हर्सूलमध्ये दहा दिवस राहावं लागलं. अमीर हबीब आणि मला ही शिक्षा तत्कालीन जजने सुनावली होती.

- स. सो. खंडाळकर

मी त्यावेळी नामांतरविरोधी असलेल्या स.भु. शिक्षण संस्थेत कारकून म्हणून काम करीत होतो. नुकताच माझा आंतरजातीय विवाह झाला होता. आम्ही जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीत काम करीत होतो. नामांतरासाठी ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकातील सत्याग्रहात आम्ही उभयता भाग घेतला. अटक होऊन मला नाशिकच्या जेलमध्ये आणि माझ्या पत्नीला हर्सूल जेलमध्ये ठेवले. पुढे बाहेर आल्यावर मी कामावर रुजू झालो; पण नामांतर लढ्यात सहभाग घेतला हा जणू गुन्हाच ठरू लागला. कार्यालयातील अन्य सहकारी माझा राग करू लागले. मला त्रास देऊ लागले. तू इथं कसा राहतोस ते पाहू, असे धमकावू लागले. मग मी स.भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोविंदभाई श्रॉफ यांना भेटलो आणि घडत असलेला सारा प्रकार त्यांच्या कानी घातला. शांतपणे त्यांनी तो ऐकला अन् मला म्हणाले, भारतीय संविधानानुसार तू तुझं जे असेल ते मत जोपासू शकतो आणि मी माझं मत जोपासू शकतो. काळजी करू नको. जा आणि तू तुझं काम कर.’ 

हा किस्सा सांगितला प्रा. श्रीराम जाधव यांनी. नामविस्तार दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ते ‘लोकमत’शी बोलत होते. प्रा. श्रीराम जाधव हे गांधीवादी, तेवढेच पुरोगामी मतांचे. नुकतेच ते पवनारला पाच वर्षे राहून आले आहेत आणि पुन्हा सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे. बारा वर्षे स.भु.मध्ये कारकून म्हणून नोकरी केल्यानंतर प्रा. जाधव यांनी एम.ए., एम.फिल. करून परभणीला दोन वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. १९९२ पर्यंत ते देवगिरी महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक होते. सेवानिवृत्ती घेऊन ते पवनार आश्रमात गेले. लग्न झाल्यानंतर हनीमूनसाठी कुठेतरी बाहेर जाण्याचे ते दिवस; पण आम्ही नामांतर लढ्यात उडी घेऊन कारावास भोगला. गोविंदभाई  नामांतर विरोधी होते; तरी त्यांनी स.भु.मधील नामांतरवाद्यांना कधीच रोखले नाही. त्यासंदर्भात माझं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. याकडे प्रा. जाधव यांनी लक्ष वेधले. नंतर मग नामांतर होईपर्यंत माझा त्यात सहभाग राहिला. नामांतर झालं, पुढं काय, हा प्रश्न आहेच. विद्यापीठ त्या गतीनं प्रगतिपथावर असायला हवं, असे ते म्हणाले.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा