शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बायको-मुलांना सोडले, चार एकर जमीन विकली, तिनेच धोका दिल्याने काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 11:42 AM

अत्याचार केल्यानंतर मक्याच्या शेतातील चिखलात तोंड दाबून मारून टाकले.

ठळक मुद्देगुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंदमारिया आल्हट हिची आत्महत्या नव्हे, हत्याच

औरंगाबाद : जिच्यासाठी बायको, मुलांना सोडले, चार एकर जमीन विकली, तिने दहा वर्षे सोबत राहिल्यानंतर म्हातारा झाल्याचे सांगून दुसरा प्रियकर पकडला. त्यामुळे संतापलेल्या माजी प्रियकराने तिला गोड बोलून शिवारात नेऊन मारून टाकले. त्यानंतर प्रेत विहिरीत टाकून दिले. ही घटना २३ सप्टेंबर रोजी घडली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाला वाळूज एमआयडीसी परिसरात एका दुसऱ्या प्रकरणाच्या तपासासाठी ५ ऑक्टोबर रोजी पाठविले होते. त्यावेळी तेथे मारिया सुरेश आल्हट या महिलेची आत्महत्या नसून खून झाल्याचे समजले. गुन्हे शाखेने त्या दिशेने तपास सुरू केला. मारियासोबत शेवटच्या वेळी कोण संपर्कात होते, याची पडताळणी करण्यात आली. यात सुनील खरात याचे नाव समोर आले. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र खाक्या दाखवताच गुन्हा कबूल केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, मारियाच्या पतीचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले होते. तिला पतीपासून एक मुलगी होती. सुनीलच्या संपर्कात आल्यानंतर दोघे दहा वर्षांपासून पती-पत्नीसारखे राहत. तिच्यासाठी सुनीलने पत्नी, मुलांना सोडून दिले. चार एकर जमीन विकली.

मारियाला सुनीलपासून दोन मुले झाली. तरीही ती काही दिवसांपासून त्याच्यापासून दूर राहू लागली. आपण आता बहीण-भावासारखे राहू, तू म्हातारा झाला आहेस, असा तिने टोमणा मारला. दुखावलेल्या सुनीलने तिला संपविण्याचे ठरविले. याच कालावधीत त्याला मारियाचे सूत एका ठेकेदारासोबत जुळल्याचे समजले. यामुळे संतापलेल्या सुनीलने २३ सप्टेंबर रोजी तुला एकदाच भेटायचे आहे. यानंतर पुन्हा येणार नाही, असे सांगून तिला एकलहरा शिवारात नेले. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर मक्याच्या शेतातील चिखलात तोंड दाबून मारून टाकले. त्यानंतर प्रेत विहिरीत टाकून दिले. हा गुन्हा पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल मस्के, सहायक फाैजदार सतीश जाधव, हवालदार सुधाकर मिसाळ, जितेंद्र ठाकूर, रवींद्र चरात, सुनील बेलकर, विजय पिंपळे आणि नितीन देशमुख यांच्या पथकाने उघडकीस आणला.

दोन मुले उघड्यावरमारियाची सहा आणि अडीच वर्षांची दोन मुले उघड्यावर आली आहेत. मारियाच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी व सुनीलच्या पहिल्या पत्नीचा मुलगा हे दोघेही संगनमताने पळून गेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अधिक तपास निरीक्षक संदीप गुरमे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद