शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

मनपा प्रशासनाचा नवा ‘गेम प्लॅन’; संचिकांमध्ये शेरे वाढवली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 18:34 IST

प्रत्येक फाईलमध्ये त्रुटी काढून पुन्हा संबंधित विभागाकडे फायली वर्ग करण्यात येत आहेत.

औरंगाबाद : महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी फक्त ७०० कोटी रुपये येतात. वस्तुस्थितीची जाणीव असतानाही सत्ताधाऱ्यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तब्बल १८०० कोटींचा अर्थसंकल्प तयार केला. प्रत्यक्षात या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्याची वेळ आल्यावर प्रशासनाला अक्षरश: घाम फुटला आहे. विकासकामांच्या संचिका, झालेल्या कामांच्या बिलांवर अधिकारी अजिबात सह्या करायला तयार नाहीत. प्रत्येक फाईलमध्ये त्रुटी काढून पुन्हा संबंधित विभागाकडे फायली वर्ग करण्यात येत आहेत. प्रशासनाचा हा नवीन गेम प्लॅन पाहून नगरसेवकही चक्रावले आहेत.

लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. २०१९ मध्ये मनपाने अर्थसंकल्प तयार केला तरी त्याची अंमलबजावणी त्वरित होणे शक्य नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी यंदा तीनपट मोठा अर्थसंकल्प तयार करून ठेवला आहे. काही नगरसेवकांच्या वॉर्डात ५ कोटी, तर काही नगरसेवकांच्या वॉर्डात तब्बल २५-३० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. अर्थसंकल्पात विकासकामांचा डोंगरच रचण्यात आला आहे. नगरसेवक अर्थसंकल्पातील कामांचा हवाला देऊन अंदाजपत्रक तयार करून घेत आहेत. लेखा विभागात हे अंदाजपत्रक आल्यावर त्यात प्रचंड त्रुटी काढून पुन्हा संबंधित विभागाकडे पाठवून देण्यात येत आहेत. मागील सहा महिन्यांत अनेक वॉर्डांमध्ये झालेल्या विकासकामांची बिलेही लेखा विभागात मोठ्या प्रमाणात साचली आहेत.

मुख्य लेखाधिकारी फायलींवर सह्याच करायला तयार नाहीत. नगरसेवक प्रत्यक्ष त्यांच्यासमोर येऊन उभे राहिल्यावर फायलींवर प्रचंड ताशेरे ओढण्यात येत आहेत. एकदा फाईल लेखा विभागातून संबंधित विभागाकडे गेल्यास परत येण्यासाठी किमान ३ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे अंदाजपत्रक असेल किंवा विकासकामांचे बिल असेल लेखा विभाग टोलवाटोलवी करीत आहे.

तिजोरी रिकामी असल्याचा परिणामलेखा विभागाकडे मागील सहा महिन्यांत ११५ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. एवढी मोठी रक्कम देण्यासाठी मनपाला किमान ६ ते ८ महिने लागतील. एप्रिलपासून बिल मिळत नसल्याने पाणीपुरवठा, विद्युत विभागाच्या कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा इशारा दिला. आयुक्तांच्या आश्वासनानंतर कंत्राटदारांनी पुन्हा कामे सुरू केली आहेत. येणाऱ्या दसरा, दिवाळीपूर्वी सर्व बिले देण्यात यावीत, अशी मागणी कंत्राटदार करीत आहेत.

वसुलीचे नियोजन शून्यमहापालिकेच्या तिजोरीत चार पैसे यावेत यादृष्टीने प्रशासन अजिबात प्रयत्न करायला तयार नाही. मालमत्ता विभाग, वसुली, नगररचना, या तीन महत्त्वाच्या विभागांकडे लक्ष द्यायला प्रशासनाला अजिबात वेळ नाही. वसुली वाढवा म्हणून पदाधिकारी बैठका घेतात, त्याचा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अजिबात परिणाम होत नाही. 

यालाच अच्छे दिन म्हणायचे का?भाजपच्या नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी महापौरांना गाठले. वॉर्डात विकासकामे करायला कंत्राटदार तयार नाहीत. विकासकामांच्या फायलींवर प्रचंड ताशेरे मारण्यात येत आहेत. यालाच आम्ही अच्छे दिन म्हणायचे का? असा प्रश्न त्यांनी केला. त्यांच्या या प्रश्नावर सेनेचे महापौर नंदकुमार घोडेलेही क्षणभर अवाक् झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी