शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा आकृतिबंध एक वर्षापासून मंत्रालयात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:15 IST

औरंगाबाद : महापालिकेत भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा करणारा आकृतिबंध मागील एक वर्षापासून मंत्रालयात धूळ खात पडला आहे. अधिकाऱ्यांच्या स्तरावर ...

औरंगाबाद : महापालिकेत भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा करणारा आकृतिबंध मागील एक वर्षापासून मंत्रालयात धूळ खात पडला आहे. अधिकाऱ्यांच्या स्तरावर आकृतिबंध मंजूर झाला असला तरी संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडून अद्याप हिरवा झेंडा दाखवलेला नाही. महापालिकेतील मोठ्या पदावरील अधिकारी लवकरच निवृत्त होत आहेत. त्यामुळे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मागण्याशिवाय प्रशासनाकडे पर्याय नाही.

महापालिकेच्या नोकर भरतीसंदर्भातील आकृतिबंध अनेक वर्षांपासून महापालिका स्तरावर रखडला होता. तत्कालीन महापौर भगवान घडमोडे यांनी १८ जुलै २०१७ च्या सर्वसाधारण सभेत आकृतिबंध व सेवा भरती नियमांचा प्रस्ताव मंजूर केला. त्यावेळी सर्वसाधारण सभेने ३६ दुरुस्त्या करण्याच्या सूचना केल्या होत्या. या दुरुस्त्या करून आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणे गरजेचे असताना तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक व उपायुक्त मंजुषा मुथा यांनी नवीनच प्रस्ताव तयार करून तो १८ जुलै २०१९ च्या सभेत आणला. त्यावर माजी नगरसेवक समीर राजूरकर यांच्यासह अधिकारी संघटनेने आक्षेप घेतला व जुना प्रस्तावच शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. गतवर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२० मध्ये हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. प्रस्ताव पाठवून काही दिवसात एक वर्ष पूर्ण होईल. मात्र अद्याप आकृतिबंधाला मंजुरी मिळालेली नाही. या प्रस्तावात शासनाने दुरुस्त्या सुचविल्या. त्या महापालिकेतर्फे पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर पदोन्नतीबाबतही आक्षेप घेण्यात आला. आता पदोन्नत्याही देण्यात आल्या, पण अद्याप आकृतिबंध मंजूर झालेला नाही.

प्रतिनियुक्तीवर अधिकारी येणार

शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, प्राणीसंग्रहालय संचालकांसह अनेक अधिकारी आगामी सहा महिन्यात निवृत्त होत आहेत. आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर महापालिकेत जम्बो भरती होईल, असा अंदाज बांधला जात होता. पण आकृतिबंधाची मंजुरी लांबणीवर पडत असल्याने नोकरभरतीची प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. प्रतिनियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी अलीकडेच दिले आहेत.