महावितरणचा पुन्हा पालिकेशी पत्रव्यवहार
By Admin | Updated: December 24, 2014 01:02 IST2014-12-24T00:39:39+5:302014-12-24T01:02:26+5:30
बीड : शहरातील २२३ रोहित्रांवरील नगरपालिकेकडून बसविण्यात आलेले टाईमर स्वीच खराब झाल्याने त्याचा फटका महावितरण कंपनीला बसत आहे

महावितरणचा पुन्हा पालिकेशी पत्रव्यवहार
बीड : शहरातील २२३ रोहित्रांवरील नगरपालिकेकडून बसविण्यात आलेले टाईमर स्वीच खराब झाल्याने त्याचा फटका महावितरण कंपनीला बसत आहे. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल महावितरण कंपनीने नगरपालिकेला थकबाकी भरण्यासाठी व शहरात नव्याने टाईमर स्वीच बसविण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
शहरातील पथदिव्यांकरिता २२३ कनेक्शन घेण्यात आले होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत खांबावरील हे स्वीच खराब झाले होते. नगरपालिकेने ते दुरुस्त न करता काही भागात अनाधिकृतपणे विद्युत कनेक्शन घेतले होते. एवढेच नाही तर पथदिवे दिवसाही सुरूच ठेवले जात होते हे स्टींगमधून समोर आले होते. यापूर्वीही या संदर्भात पालिकेला पत्रव्यवहार केला होता. मंगळवारी पुन्हा पालिकेला पत्र पाठविले आहे. (प्रतिनिधी)