शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Mothers Day : विशेष मुलांसाठी ‘स्वयंसिद्ध’ झालेले मातृत्व 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 7:17 AM

विशेष मुलांसाठी ‘स्वयंसिद्ध’ झालेले मातृत्वच येथे पाहायला मिळते. 

- ऋचिका पालोदकरऔरंगाबाद : आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी सुखकारक अनुभव असतो; पण जेव्हा आपल्यापोटी आलेले अपत्य हे विशेष मूल आहे असे समजते, तेव्हा ही आई खचते, हतबल होते; पण वास्तवाची जाणीव आणि अपत्याचे भविष्य समोर दिसताच खंबीरपणे उभी राहून मुलाचा आधार बनते. औरंगाबाद शहरातील विशेष मुलांच्या मातांनी निर्धाराने त्यांच्या बालकांचे ‘विशेषत्व’ स्वीकारले आणि २००१ साली एकत्र येऊन स्वयंसिद्ध संचलित विवेकसिंग विशेष शाळेचे बीज रोवले. विशेष मुलांसाठी ‘स्वयंसिद्ध’ झालेले मातृत्वच येथे पाहायला मिळते. 

एक आई आपल्या बालकासाठी काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा. येथे काम करणारी प्रत्येक शिक्षिका आधी एका विशेष मुलाची आई आहे. त्यामुळे संस्थेतील कोणत्याही मुलाकडे ती एक आई म्हणूनच पाहते. कोणत्याही मुलासाठी झटताना व्यावसायिकतेच्या सगळ्या सीमा गळून पडतात आणि तिच्यातील मातृत्व आधी जागरूक होते. २००१ साली अर्चना जोशी, वर्षा भाले, विद्या सान्वीकर, नीता कुलकर्णी, स्मिता माणकेश्वर, अंजली मेढेकर, अंजली गेलांडे, माधुरी देशपांडे, वृषाली देशपांडे, संपदा पाटोळे, अंजू तायल या ११ विशेष मुलांच्या मातांनी एकत्र येऊन आपल्या मुलांसाठी तसेच शहरातील इतर विशेष मुलांसाठी पाळणाघर सुरू केले. एकमेकींचा आधार बनून वास्तवावर मात करणे आणि आपल्या मुलांसोबतच इतरही विशेष मुलांचा सांभाळ करणे, हा या मागचा प्रांजळ हेतू होता. विशेष मुलांच्या बाबतीत असणाऱ्या प्रश्नांचा पाठपुरावा करून विशेष मुलांसाठी शासनदरबारी प्रयत्न करण्यासाठी ही मातृशक्ती एकत्र आली होती.

विशेष शाळा विशेष मुलांच्या जडणघडणीसंदर्भातील गरजा पाहता पाळणाघर किंवा उन्हाळी शिबिरापुरतेच हे काम मर्यादित ठेवून उपयोग नाही ही जाणीव झाली. त्यांनी रीतसर संस्था स्थापन करून २००७ साली स्वयंसिद्ध संचलित विवेकसिंग विशेष शाळा सुरू केली. 

९० विशेष मुलेशाळा सुरू केल्यानंतर या क्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षकांची गरज निर्माण झाली आणि काही मातांनी पुढाकार घेऊन या मुलांसाठी स्पेशल एज्युकेशन घेऊन बी.एड. पूर्ण केले. आज या शाळेत साधारण ९० विशेष मुले आपापल्या क्षमतेनुसार शिक्षण घेतात. विशेष मुलांची माता म्हणून अनुभव संपन्न असणाऱ्या या मातांकडे आज अनेक विशेष मुलांच्या माता पूर्ण विश्वासाने त्यांचे मूल सोपवितात, हीच या मातांची खरी कमाई आहे.

लहानांपासून थोरांपर्यंतवयाने जास्त असणाऱ्या विशेष लोकांसाठी संस्थेमध्ये कार्यशाळा घेतल्या जातात. याअंतर्गत फुलवात, कागदी पिशव्या, शेवया तसेच तोरण, दिवे, शुभेच्छापत्रे अशा वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आता या गोष्टी उत्तम प्रकारे बनवल्या जात असून, यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून दर महिन्याला या विशेष लोकांना पगार वाटप करण्याचा उपक्रमही लवकरच संस्थेत सुरू होईल, असे अंजू तायल यांनी सांगितले. 

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक