माणसांपेक्षा बैलांची काळजी अधिक?
By Admin | Updated: December 12, 2014 00:55 IST2014-12-11T23:37:46+5:302014-12-12T00:55:01+5:30
अशोक कारके, औरंगाबाद उसाला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी दरवर्षी ठिकठिकाणी आंदोलन करतात. ऊसतोड कामगार योग्य मोबदला, सेवासुविधा आणि सुरक्षा मिळावी म्हणून आंदोलन करताना दिसतात.

माणसांपेक्षा बैलांची काळजी अधिक?
अशोक कारके, औरंगाबाद
उसाला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी दरवर्षी ठिकठिकाणी आंदोलन करतात. ऊसतोड कामगार योग्य मोबदला, सेवासुविधा आणि सुरक्षा मिळावी म्हणून आंदोलन करताना दिसतात.
जगण्यासाठी झगडणाऱ्या या माणसांकडे दुर्लक्ष करून बैलांची काळजी घेण्याचे आदेश साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना दिले आहेत. मुक्या प्राण्यांवर अत्याचार करू नयेत हे खरे असले तरी मानवाचाही ‘माणुसकी’ने विचार करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
राज्यातील शेतकरी आणि ऊसतोड कामगार काहीतरी पदरात पडावे म्हणून अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. त्यांच्या मागण्यांवर वर्षानुवर्षे निर्णय घेण्यात येत नाही.
ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या रखडलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्याकडे प्रशासन लक्ष देत नाही; पण पुणे येथील साखर आयुक्तांनी नुकतेच प्राणी क्रूरता अधिनियमानुसार (ओझे वाहणारे व कष्टकरी प्राणी अधिनियम १९६५) राज्यातील साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी आदेश काढले आहेत. यामध्ये बैलांवर अति वजन टाकू नये, असमान बैलांना गाडीस जुंपू नये, कामाच्या वेळेचे बंधन, बैलांना विश्रांती, वयस्कर आणि आजारी बैलांकडून काम करून घेऊ नये, त्यांना आरोग्यसेवा द्यावी, नाल मारण्यासाठी योग्य जागा बनवावी, प्रशिक्षित व्यक्तीकडून नाल मारावी, वजन काट्यांवर बैल घसरू नये याची काळजी घ्यावी, स्वच्छता ठेवावी, पाणी, निवाऱ्याची व्यवस्था करावी या मुद्यांचा समावेश आहे.