शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

नावाला पावसाळा, झळा मात्र उन्हाळ्याच्या!; वैजापूर तालुक्यातील जिरी गावात पिकांबरोबर मनेही करपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:57 IST

पावसाळ्यातही पाण्याच्या थेंबासाठी आतूर झालेले गावकरी सुन्न मनाने जीवन जगताहेत.

- मोबीन खान 

वैजापूर (जि. औरंगाबाद) : जुलै महिन्यातच पिके करपून गेल्यानंतर गावातील शेतकरी शेताकडे फिरकलेच नाहीत. शेतात जाऊन काय बघायचं, सुकलेल्या पिकांच्या काड्या ! त्यापेक्षा शेतात न गेलेले बरे. उजाड पीक आणि उजाड रान, त्यात उन्हाचे चटके. जमिनीला भेगा पडलेल्या. गावात पाण्याचे टँकर कधी येते कधी नाही. शेतीची कामे नसल्याने हात रिकामे. गावात रोजगार नाही. खायचं काय, पावसाळ्यातही पाण्याच्या थेंबासाठी आतूर झालेले गावकरी सुन्न मनाने जीवन जगताहेत. हे भीषण वास्तव आहे, वैजापूर तालुक्यातील जिरी या छोट्याशा गावचे.

दोन महिन्यांपासून पावसाने खंड दिल्याने जिरी या लहानशा गावातील तब्बल १८०० हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. दुबार पेरणी करुनही पिके येण्याची आशा मावळल्याने येथील शेतकरी हताश झाला आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई पाचवीला पुजलेली आहे.   या परिसरातील एकुलत्या एक ढेकू तलावातसुद्धा पाण्याचा थेंब नाही. गेल्या गुरुवारी, शुक्रवारी व नंतर काल सोमवारपासून कोसळणाऱ्या हलक्या श्रावणसरींमुळे पावसाळा असल्याचे जाणवत आहे. या सरींनी उकाडा तेवढा कमी झाला, बाकी दुष्काळाची दाहकता कायम आहे. 

डोंगरथडी भागातील या गावाची लोकसंख्या १२००. उदरनिवार्हासाठी शेतीशिवाय दुसरे साधन नाही. यावर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने शिवारातील १८०० हेक्टर क्षेत्रावर कपाशी, मका, सोयाबीन, तूर, मूग, भुईमूग आदी पिकांची पेरणी झाली. पण त्यानंतर पाऊस गायब झाला. या महिन्यात झालेल्या पावसाने कपाशी, मका, बाजरी आदी पिकांना जीवदान मिळाले असले तरी सरासरी उत्पन्नात घट होणार आहे. एक मेपासून गावात पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने टँकर सुरु केले आहे. पण या टँकरद्वारे दोन ते तीन दिवसांनी कुटुंबाला दोनशे लिटर पाणी मिळते. यावर तहान कशी भागणार, हा या गावकऱ्यांचा सवाल. 

रोजगारासाठी शहराकडे धावउजाड रानाकडे पाहताना भाकरीचा चंद्र कसा शोधणार याची चिंता बळीराजाला सतावत असल्याचे भीषण वास्तव डोंगरथडी भागातील जिरी गावची पाहणी केल्यानंतर समोर आले. पिकांची निराशा, पाणीटंचाई व निसर्गाची अवकृपा यामुळे अनेकांनी गाव सोडून रोजगाराच्या शोधासाठी शहराकडे धाव घेतली आहे. 

जिल्हाधिकारीही धावलेकृषी विभागातर्फे या परिस्थितीचा अहवाल पाठविल्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार सुमन मोरे व कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने ८ आॅगस्ट रोजी या गावाला भेट दिली. त्यावेळी गावकऱ्यांनी पथकापुढे समस्यांचा पाढाच वाचला. पंचनामा केल्यानंतर अहवाल पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या. परंतु प्रशासनातर्फे पुढचे कुठलेच पाऊल उचलले गेले नाही. 

काम नाही अन् पाणीही नाहीशेतीची कामे ठप्प झाल्याने शेतकऱ्यांच्या हातांनाही काम नाही. आजूबाजूच्या गावात काम शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. गावात भकास वातावरण पाहायला मिळत आहे. भर पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची जिरीकरांवर वेळ आली आहे, असे सरपंच लहानूबाई कारभारी शिंदे यांनी सांगितले. 

आभुषणे विकण्याची वेळगावात लोकांना प्यायला पाणी नाही, तर गुरांना कोठून देणार, पाण्याअभावी गुरे नजरेसमोर तडफडून मरण्यापेक्षा विकण्यास सुरुवात केलेली बरी. पण गुरे विकत तरी कोण घेणार, दारात दुभती गाय आणि आडदांड बैल ही शेतकऱ्यांची आभूषणे समजली जातात. पण शेतकऱ्यांवर ही आभूषणे विकण्याची वेळ आली आहे. दुसरा कोणताच शेतकरी गुरे विकत घेण्यास तयार होईना. आता कसायाकडे गुरे द्यायची का, असा सवाल रावसाहेब चव्हाण यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र