शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नावाला पावसाळा, झळा मात्र उन्हाळ्याच्या!; वैजापूर तालुक्यातील जिरी गावात पिकांबरोबर मनेही करपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:57 IST

पावसाळ्यातही पाण्याच्या थेंबासाठी आतूर झालेले गावकरी सुन्न मनाने जीवन जगताहेत.

- मोबीन खान 

वैजापूर (जि. औरंगाबाद) : जुलै महिन्यातच पिके करपून गेल्यानंतर गावातील शेतकरी शेताकडे फिरकलेच नाहीत. शेतात जाऊन काय बघायचं, सुकलेल्या पिकांच्या काड्या ! त्यापेक्षा शेतात न गेलेले बरे. उजाड पीक आणि उजाड रान, त्यात उन्हाचे चटके. जमिनीला भेगा पडलेल्या. गावात पाण्याचे टँकर कधी येते कधी नाही. शेतीची कामे नसल्याने हात रिकामे. गावात रोजगार नाही. खायचं काय, पावसाळ्यातही पाण्याच्या थेंबासाठी आतूर झालेले गावकरी सुन्न मनाने जीवन जगताहेत. हे भीषण वास्तव आहे, वैजापूर तालुक्यातील जिरी या छोट्याशा गावचे.

दोन महिन्यांपासून पावसाने खंड दिल्याने जिरी या लहानशा गावातील तब्बल १८०० हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. दुबार पेरणी करुनही पिके येण्याची आशा मावळल्याने येथील शेतकरी हताश झाला आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई पाचवीला पुजलेली आहे.   या परिसरातील एकुलत्या एक ढेकू तलावातसुद्धा पाण्याचा थेंब नाही. गेल्या गुरुवारी, शुक्रवारी व नंतर काल सोमवारपासून कोसळणाऱ्या हलक्या श्रावणसरींमुळे पावसाळा असल्याचे जाणवत आहे. या सरींनी उकाडा तेवढा कमी झाला, बाकी दुष्काळाची दाहकता कायम आहे. 

डोंगरथडी भागातील या गावाची लोकसंख्या १२००. उदरनिवार्हासाठी शेतीशिवाय दुसरे साधन नाही. यावर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने शिवारातील १८०० हेक्टर क्षेत्रावर कपाशी, मका, सोयाबीन, तूर, मूग, भुईमूग आदी पिकांची पेरणी झाली. पण त्यानंतर पाऊस गायब झाला. या महिन्यात झालेल्या पावसाने कपाशी, मका, बाजरी आदी पिकांना जीवदान मिळाले असले तरी सरासरी उत्पन्नात घट होणार आहे. एक मेपासून गावात पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने टँकर सुरु केले आहे. पण या टँकरद्वारे दोन ते तीन दिवसांनी कुटुंबाला दोनशे लिटर पाणी मिळते. यावर तहान कशी भागणार, हा या गावकऱ्यांचा सवाल. 

रोजगारासाठी शहराकडे धावउजाड रानाकडे पाहताना भाकरीचा चंद्र कसा शोधणार याची चिंता बळीराजाला सतावत असल्याचे भीषण वास्तव डोंगरथडी भागातील जिरी गावची पाहणी केल्यानंतर समोर आले. पिकांची निराशा, पाणीटंचाई व निसर्गाची अवकृपा यामुळे अनेकांनी गाव सोडून रोजगाराच्या शोधासाठी शहराकडे धाव घेतली आहे. 

जिल्हाधिकारीही धावलेकृषी विभागातर्फे या परिस्थितीचा अहवाल पाठविल्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार सुमन मोरे व कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने ८ आॅगस्ट रोजी या गावाला भेट दिली. त्यावेळी गावकऱ्यांनी पथकापुढे समस्यांचा पाढाच वाचला. पंचनामा केल्यानंतर अहवाल पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या. परंतु प्रशासनातर्फे पुढचे कुठलेच पाऊल उचलले गेले नाही. 

काम नाही अन् पाणीही नाहीशेतीची कामे ठप्प झाल्याने शेतकऱ्यांच्या हातांनाही काम नाही. आजूबाजूच्या गावात काम शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. गावात भकास वातावरण पाहायला मिळत आहे. भर पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची जिरीकरांवर वेळ आली आहे, असे सरपंच लहानूबाई कारभारी शिंदे यांनी सांगितले. 

आभुषणे विकण्याची वेळगावात लोकांना प्यायला पाणी नाही, तर गुरांना कोठून देणार, पाण्याअभावी गुरे नजरेसमोर तडफडून मरण्यापेक्षा विकण्यास सुरुवात केलेली बरी. पण गुरे विकत तरी कोण घेणार, दारात दुभती गाय आणि आडदांड बैल ही शेतकऱ्यांची आभूषणे समजली जातात. पण शेतकऱ्यांवर ही आभूषणे विकण्याची वेळ आली आहे. दुसरा कोणताच शेतकरी गुरे विकत घेण्यास तयार होईना. आता कसायाकडे गुरे द्यायची का, असा सवाल रावसाहेब चव्हाण यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र