मनसेचे ‘हलगी नाद’ आंदोलन !
By Admin | Updated: January 9, 2015 00:50 IST2015-01-09T00:31:16+5:302015-01-09T00:50:51+5:30
लातूर : उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मांजरा सहकारी साखर कारखान्यासमोर शुक्रवारी ‘हलगी नाद’ आंदोलन करण्यात आले.

मनसेचे ‘हलगी नाद’ आंदोलन !
लातूर : उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मांजरा सहकारी साखर कारखान्यासमोर शुक्रवारी ‘हलगी नाद’ आंदोलन करण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४०० ते ११०० रुपये प्रमाणे पहिला हप्ता दिला आहे. जो भाव एफआरपीपेक्षा ६०० ते ७०० रुपयांनी कमी आहे, शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे भाव न दिल्यास कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून मनसेच्या वतीने धरणे, उपोषण, रस्ता रोको, पानगाव येथील कारखान्यासमोर हलगी नाद आंदोलन करण्यात आले असून, शुक्रवारी मांजरा कारखान्यासमोर मनसे कार्यकर्त्यांनी एक तास ‘हलगी नाद’ आंदोलन केले. आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे, शिवकुमार नागराळे, प्रसाद स्वामी, लताताई गायकवाड, अनिता अंकुशे, बाळासाहेब मुंडे, गणेश गवारे, गजानन कातळे, अॅड. अजय कलशेट्टी, अॅड. बालाजी चापोलीकर, भास्कर औताडे, नारायण गिरी, मनमोहन डागा, एस. सोनी, सय्यद बशीर, सुरेश गालफाडे, भागवत कांदे, नारायण गिरी आदींनी सहभाग नोंदविला होता. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अद्याप एफआरपीप्रमाणे भाव जाहीर केला नाही. १४०० ते १५०० टन प्रमाणे पहिला हप्ता देण्यात येत आहे. हा भाव एफआरपीप्रमाणे ७०० रुपयांनी कमी आहे. जोपर्यंत एफआरपीप्रमाणे भाव दिला जात नाही, तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरू राहील, असे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यावेळी म्हणाले.
कारखानदारांना जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘हलगी नाद’ आंदोलन करीत आहे. आतापर्यंत दोन कारखान्यांवर आंदोलन झाले आहे. सर्वच कारखान्यांवर हे आंदोलन करून एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या पदरात भाव पाडून घेऊ, असेही नागरगोजे यावेळी म्हणाले.