शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'हे हिवाळी अधिवेशन धोरणात्मक निर्णयांनी गाजणारे असणार'; संजय शिरसाट यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 13:47 IST

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरु होईल. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. सरकारकडून या अधिवेशनसाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानच्या यशामुळे उत्साह वाढलेल्या ट्रीपल इंजिन सरकारचा उद्यापासून मनोबल खचलेल्या विरोधकांशी सामना होणार आहे. 

मराठा आरक्षणावरुन सुरू असलेला संघर्ष, पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, कंत्राटी भरती, राज्यातील दुष्काळजन्य स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या मुद्द्यांवरून अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनाची वेळ वाढविण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे आमदार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. 

धोरणात्मक निर्णयांनी गाजणारे हे हिवाळी अधिवेशन असणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणार निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येणार असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे. संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना आरोग्य व्यवस्थेवरुन पत्र लिहिलं आहे. यावर देखील संजय शिसराट यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी दिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना पोहोचलं आहे की नाही हे माहित नाही. दिल्लीला एवढ्या चकरा मारता, पवारांच्या सिल्व्हर ओकवर जाता मग मुख्यमंत्र्यांच्या देखील हातात पत्र दिले असते. त्यांनी कसे पत्र पाठवले, याची कल्पना नाही, असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला.

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती, अवकाळी पावसामुळे नुकसान, वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारीवरून सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल,  तर ‘निकाला’चे अस्त्र समोर करून सत्ताधारी विरोधी धार बोथट करण्याचा प्रयत्न करतील. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक स्थितीवर विधिमंडळात चर्चा होणार असून, सरकारकडून तसा प्रस्ताव मांडला जाणार आहे. या प्रस्तावावरील चर्चेत सभागृहात खडाजंगी होण्याचे संकेत आहेत. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनSanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी