औरंगाबाद : एमजीएम टी-२० करंडक क्रिकेट स्पर्धेस उद्या, शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले असून, यातील ४ संघ हे औरंगाबाद शहराबाहेरील आहेत. विजेत्या संघास ५० हजार रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सामनावीर, मालिकावीर असे वैयक्तिक पुरस्कारही ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन एमजीएम क्रिकेट मैदानावर सकाळी ९ वाजता एम.एस.ई.बी.चे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे, सहसचिव शिरीष बोराळकर, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. गिरीश गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक सागर शेवाळे, मनीष पोलकम, नीलेश हारदे, जॉय थॉमस, शाम तळेगावकर आदी परिश्रम घेत आहेत.
एमजीएम टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:35 AM