शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पारा ४३.६ अंशांवर : २६ एप्रिल १९५८ रोजी होते इतकेच तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:31 PM

शहराच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून, शनिवारी कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला. २६ एप्रिल १९५८ रोजी इतकेच तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ६१ वर्षांनंतर याच उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड झाला.

ठळक मुद्दे६१ वर्षांनंतर तापमानाचा रेकॉर्ड

औरंगाबाद : शहराच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून, शनिवारी कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला. २६ एप्रिल १९५८ रोजी इतकेच तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ६१ वर्षांनंतर याच उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड झाला.एप्रिल महिन्याच्या प्रारंभी काही दिवस तापमानाने चाळिशी पार केली होती. त्यानंतर अवक ाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली. २३ एप्रिलपासून शहराच्या कमाल आणि किमान तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होत आहे. दुपारी उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असून, सायंकाळी ऊन कमी झाल्यानंतरही वातावरणात प्रचंड उकाडा कायम राहत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.या मोसमामध्ये शहरात ४ एप्रिल रोजी तापमान ४१.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यानंतर तापमान ४० अंशाजवळ कायम होते. मात्र, १६ एप्रिल रोजी शहरातील तापमानात ७ अंशांची घसरण झाली आणि ४२ अंशांवर गेलेला पारा मंगळवारी थेट ३४.८ अंशांपर्यंत घसरला; परंतु चार दिवसांपासून तापमानाने पुन्हा एकदा उसळी घेतली असून, शनिवारी कमाल तापमान ४३.६ अंशांवर गेले, तर किमान तापमान ३०.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही मोठी वाढ झाली असून, उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे.यापूर्वी असे राहिले तापमानशहरात यापूर्वी २६ एप्रिल १९५८ मध्ये ४३.६ अंश तापमान नोंदविले गेले होते. त्यानंतर १७ एप्रिल २०१० रोजी ४३.५ अंश तापमान होते. त्यानंतर बहुतांश वर्षी एप्रिलमध्ये तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंशांदरम्यान राहिला. मात्र, १९५८ नंतर पुन्हा एकदा शनिवारी तापमानाचा पारा ४३.६ अंशांवर गेला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTemperatureतापमान